शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

इस्लामपूर बाजार समितीच्या सेस आकारणीला स्थगिती : कृषी राज्यमंत्र्यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:18 IST

इस्लामपूर : शासनाने आदेश देऊनही इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू न केल्याबद्दल बाजार समितीला आवाराबाहेरील सोयाबीन खरेदी-विक्रीवर सेस आकारू देऊ नका,

ठळक मुद्देशेतकºयांना सोळा कोटींची कर्जमाफीपेठ-सांगली रस्त्याचे निकृष्ट काम करणाºया ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश

इस्लामपूर : शासनाने आदेश देऊनही इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू न केल्याबद्दल बाजार समितीला आवाराबाहेरील सोयाबीन खरेदी-विक्रीवर सेस आकारू देऊ नका, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहायक निबंधक कार्यालयाला दिले. बाजार समितीने सेस आकारण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामपूर येथे जानेवारीत कृषी महोत्सव आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.

येथील नगरपालिकेत शनिवारी तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, सागर खोत, अंकुश कांबळे, सुनील खोत यांची उपस्थिती होती.आढावा बैठकीत खोत यांनी तालुक्यात पाणंद रस्ते करण्याची धडक मोहीम राबवण्याचा आदेश देत, पंचायत समिती बांधकाम विभागाने १४, तर सार्वजनिक बांधकामने १० असे एकूण २४ पाणंद रस्ते यावर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

माहिती अधिकाराची भीती घालून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची नावे द्या, ती माहिती आयोगाला कळवू, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी चांगल्या कामांना खीळ बसणार नाही. त्यातून तालुक्याचे नुकसान होईल अशी कृती करू नये. अधिकाºयांनी योग्य कामे करताना योग्यप्रकारे निधी खर्च करावा. तक्रारींना घाबरू नका. सरकार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला.वीज वितरणवरील चर्चेवेळी अधिकारी निधीचे कारण पुढे करीत होते. त्यावेळी मंत्री खोत यांनी निधी नसला तरी, आहे ती कामे व्यवस्थित करा. तुमच्या स्तरावर योग्य असणारी कामे कोणतीही आडकाठी न करता करा. शेतकºयांची कामे प्राधान्याने करा.

हे सरकार शेतकºयांसाठी काम करणारे आहे, असे सुनावले. कृषी विभागाच्या आढाव्यात पॉलिहाऊस धारक, कृषी अभियांत्रिकीकरण, लघुसिंचन, सुक्ष्मसिंचन, फळबाग लागवड, जलयुक्त शिवार, छोटे पाटबंधारे अशा विभागांनी आपल्याकडील अनुदानाचे प्रस्ताव द्यावेत, शासनाकडून निधी पाठवून देऊ, असे स्पष्ट केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची खरडपट्टी करताना खोत यांनी विकासकामांबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. केवळ डांबरी रस्ते, मोठे पूल बांधण्यासाठी जन्म झाला काय? पाणंद रस्ते कुणी करायचे, असा प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाºयांना पूर्ण झालेल्या दोन कामांची माहिती नीटपणे देता आली नाही. पेठ-सांगली रस्त्याचे निकृष्ट काम करणाºया ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश दिले. रेठरेधरण पाझर तलावाचे काम सुरू न करणाºया ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे फर्मान सोडले.

निबंधक कार्यालयाने तालुक्यातील १२०० शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी ५४ लाखांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. ६८४४ शेतकºयांना ११ कोटी ९ लाखांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यात एकूण ६२ हजार ५२६ शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज सादर केले आहेत. अर्जामध्ये काही त्रुटी असतील, तर त्या दूर करून तालुक्यातील सर्व श्ेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे निर्देश खोत यांनी यांनी दिले.बी. जी. पाटील यांनी वीज वितरण, टेकड्या खुदाई, कृषी विभागाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले. खोत यांनी तक्रारी करण्यापेक्षा नागरिकांनी सोबत घेऊन त्यांची कामे मार्गी लावा, त्यात मोठे समाधान मिळेल, असा टोला मारला.अजब कार्यालयमहाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कामाचा आढावा घेताना मनुष्यबळ कमी असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. खोत यांनी विचारणा केल्यावर तेथे दोन अधिकारी व पाच शिपाई असल्याची बाब समोर आली. त्यावेळी खोत यांनी आश्चर्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असा चमत्कार ऐकल्याचे सांगत कपाळावर हात मारून घेतला.