शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर बाजार समितीच्या सेस आकारणीला स्थगिती : कृषी राज्यमंत्र्यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:18 IST

इस्लामपूर : शासनाने आदेश देऊनही इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू न केल्याबद्दल बाजार समितीला आवाराबाहेरील सोयाबीन खरेदी-विक्रीवर सेस आकारू देऊ नका,

ठळक मुद्देशेतकºयांना सोळा कोटींची कर्जमाफीपेठ-सांगली रस्त्याचे निकृष्ट काम करणाºया ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश

इस्लामपूर : शासनाने आदेश देऊनही इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू न केल्याबद्दल बाजार समितीला आवाराबाहेरील सोयाबीन खरेदी-विक्रीवर सेस आकारू देऊ नका, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहायक निबंधक कार्यालयाला दिले. बाजार समितीने सेस आकारण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामपूर येथे जानेवारीत कृषी महोत्सव आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.

येथील नगरपालिकेत शनिवारी तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, सागर खोत, अंकुश कांबळे, सुनील खोत यांची उपस्थिती होती.आढावा बैठकीत खोत यांनी तालुक्यात पाणंद रस्ते करण्याची धडक मोहीम राबवण्याचा आदेश देत, पंचायत समिती बांधकाम विभागाने १४, तर सार्वजनिक बांधकामने १० असे एकूण २४ पाणंद रस्ते यावर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

माहिती अधिकाराची भीती घालून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची नावे द्या, ती माहिती आयोगाला कळवू, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी चांगल्या कामांना खीळ बसणार नाही. त्यातून तालुक्याचे नुकसान होईल अशी कृती करू नये. अधिकाºयांनी योग्य कामे करताना योग्यप्रकारे निधी खर्च करावा. तक्रारींना घाबरू नका. सरकार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला.वीज वितरणवरील चर्चेवेळी अधिकारी निधीचे कारण पुढे करीत होते. त्यावेळी मंत्री खोत यांनी निधी नसला तरी, आहे ती कामे व्यवस्थित करा. तुमच्या स्तरावर योग्य असणारी कामे कोणतीही आडकाठी न करता करा. शेतकºयांची कामे प्राधान्याने करा.

हे सरकार शेतकºयांसाठी काम करणारे आहे, असे सुनावले. कृषी विभागाच्या आढाव्यात पॉलिहाऊस धारक, कृषी अभियांत्रिकीकरण, लघुसिंचन, सुक्ष्मसिंचन, फळबाग लागवड, जलयुक्त शिवार, छोटे पाटबंधारे अशा विभागांनी आपल्याकडील अनुदानाचे प्रस्ताव द्यावेत, शासनाकडून निधी पाठवून देऊ, असे स्पष्ट केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची खरडपट्टी करताना खोत यांनी विकासकामांबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. केवळ डांबरी रस्ते, मोठे पूल बांधण्यासाठी जन्म झाला काय? पाणंद रस्ते कुणी करायचे, असा प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाºयांना पूर्ण झालेल्या दोन कामांची माहिती नीटपणे देता आली नाही. पेठ-सांगली रस्त्याचे निकृष्ट काम करणाºया ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश दिले. रेठरेधरण पाझर तलावाचे काम सुरू न करणाºया ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे फर्मान सोडले.

निबंधक कार्यालयाने तालुक्यातील १२०० शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी ५४ लाखांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. ६८४४ शेतकºयांना ११ कोटी ९ लाखांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यात एकूण ६२ हजार ५२६ शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज सादर केले आहेत. अर्जामध्ये काही त्रुटी असतील, तर त्या दूर करून तालुक्यातील सर्व श्ेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे निर्देश खोत यांनी यांनी दिले.बी. जी. पाटील यांनी वीज वितरण, टेकड्या खुदाई, कृषी विभागाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले. खोत यांनी तक्रारी करण्यापेक्षा नागरिकांनी सोबत घेऊन त्यांची कामे मार्गी लावा, त्यात मोठे समाधान मिळेल, असा टोला मारला.अजब कार्यालयमहाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कामाचा आढावा घेताना मनुष्यबळ कमी असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. खोत यांनी विचारणा केल्यावर तेथे दोन अधिकारी व पाच शिपाई असल्याची बाब समोर आली. त्यावेळी खोत यांनी आश्चर्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असा चमत्कार ऐकल्याचे सांगत कपाळावर हात मारून घेतला.