शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली सीमांवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला जिल्ह्यातील वकिलांनी ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली सीमांवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून पाठिंबा दिला. हे कायदे करणाऱ्या यंत्रणेचाही त्यांनी निषेध नोंदविला.

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीतर्फे ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनची विशेष सभा झाली. सभेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित न पाहता भांडवलदारांच्या हिताचा जास्त विचार करून हे कृषी कायदे घाईगडबडीत केले. ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, लोकसभेतील बहुमताचा वापर करून हा कायदा संमत केला. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे, ॲड. प्रल्हाद लाड, माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस यांनीही जिल्ह्यातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून एक दिवस अलिप्त राहून आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत समर्थन केले. ॲड. सुभाष पिसाळ, ॲड. सी. आर. पाटील, ॲड. पिराजी भावके यांनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीस असोसिएशनचे सचिव ॲड. गुरुप्रसाद माळकर, ॲड. शिल्पा सुतार, ॲड. स्वप्ना हराळे, ॲड. रेश्‍मा भुरके, ॲड. कादंबरी मोरे, ॲड. पृथ्वीराज देशमुख, ॲड. अतुल जाधव, ॲड. सर्वेश राणे, ॲड. अजित पाटील, आदी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयानुसार शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील मंगळवारी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले.

सभेतील ठराव

- केंद्राने संमत केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत.

- जिल्ह्यातील सर्व वकील न्यायालयीन कामापासून अलिप्त.

- आंदोलकांवरील गुन्हे विनामूल्य लढविणार.

(तानाजी)