शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

बच्च कडूंच्या समर्थनार्थ ‘प्रहार’चे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:11 IST

कोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे दिव्यांग वित्त महामंडळाच्या कर्जाबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून दिव्यांग बांधवांतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ, शेतकरी व विधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरोधात शुक्रवारपासून अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधिस्थळ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिव्यांग बांधवांनीही आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. शासनाकडून जोपर्यंत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांवर कार्यवाही करून सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती यांनी तीन टक्के अपंग निधी तातडीने वितरित करावा. दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे. मानधनाकरिता २१००० रुपये असणारी उत्पन्नाची अट शिथिल करून एक लाख रुपये करावी, त्याचबरोबर दिव्यांगांना समप्रमाणात मानधन वितरित करावे. दिव्यांगांना कर्जमाफी देऊन दिव्यांग वित्त महामंडळाच्या कर्जाबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात. दिव्यांग-अव्यंग योजनेचे प्रोत्साहन अनुदान वाढवून एक लाख रुपये करावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात देवदत्त माने, संदीप दळवी, अफजल सरकार, संजय जाधव, रामचंद्र वडेर, अविनाश केकरे, आशितोष डोंगरे, आदींसह दिव्यांग सहभागी झाले होेते. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.