शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मागणीपेक्षा पुरवठा जास्त, तरीही पाणी का येत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

कोल्हापूर : शहरात मागणीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होतो, तरीही नागरिकांच्या पाण्यासाठी तक्रारी का येतात? नगरसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यात ...

कोल्हापूर : शहरात मागणीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होतो, तरीही नागरिकांच्या पाण्यासाठी तक्रारी का येतात? नगरसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यात वाद का होतात, असा सवाल आमदार जाधव यांनी मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील, जल अभियंता नारायण कुंभार, हर्षजीत घाटगे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उत्तम नियोजन, काटकसर व लोकाभिमुख कारभारातून महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग स्वयंपूर्ण करावा असे आवाहन त्यांनी केले.

शहरात नऊ ते दहा कोटी लीटरची पाण्याची मागणी असतानाही १४.५० कोटी लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तरीही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तसेच काही भागात कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची तक्रार आहे. थेट सायपन पद्धतीने पाणी पुरवठा करण्याऐवजी प्रत्येक भागातील पाण्याची टाकी आधी भरून घ्यावी, त्यानंतर टाकीतून पाणी पुरवठा करावा, असे जाधव यांनी सुचविले.

बालिंगा, पुईखडी, कळंबा व बावडा येथील फिल्टरेशन प्लॅन्टची माहिती घेऊन, या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीबाबत सूचना केल्या. पंप हाऊसची स्वच्छता करून रंगरंगोटी करून घ्यावी, महिन्यातून एकदा फिल्टरेशन प्लॅन्ट व पंप हाऊसची देखभाल दुरुस्ती करावी. अमृत योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

पाणी पुरवठा विभागाला वर्षाला महापालिकेतून पैसे घ्यावे लागतात, हे बरोबर नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःची योजना म्हणून काम करावे. शिस्त, उत्तम नियोजन, काटकसर व लोकाभिमुख कारभारातून पाणी योजना स्वयंपूर्णच नव्हे तर फायद्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

.

पॉईंटर -

- घरफाळा, पाणीपट्टी थकबाकी दंडात पन्नास टक्के सवलत द्यावी

- बालिंगा पंप हाऊसवरील गळती काढण्यासाठी प्रस्ताव तयार करा.

- ज्या पाण्याच्या टाक्यांना झाकण नाही, ती त्वरित बसविण्यात यावीत.