शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

ग्रामपंचायत प्रचाराचा सुपर संडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीतच उमेदवारांचा दिवस गेला. प्रत्येक गावात जेवणावळीचा धडाका सुरू असून धाबे, हॉटेल फुल दिसत आहेत. ज्या ठिकाणी हायहोल्टेज लढती आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी’ दर्शन सुरू आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती, त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८६ ग्रामपंचायतींसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक सोयीच्या आघाड्यांमध्येच लढती होत आहेत. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जेवणावळीचा धडाका सुरू असल्याने धाबे, हॉटेल फुल झाली आहेत. तरुणांना रोज जेवणाचे कूपन दिले जातात, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. महिला व वयोवृद्ध मतदारांसाठी जेवणाची पार्सल पोहोच होते. रोज जेवणावळी सुरू असल्याने अनेक घरांत एक वेळचे जेवणच तयार करावे लागल्याचे चित्र आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व शहराच्या शेजारील गावात तर हायहोल्टेज लढती पाहावयास मिळत आहेत. येथे जेवणावळीबरोबरच मतदारांना रोज ‘लक्ष्मी’ दर्शन होत आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीसाठी उमेदवारांची सकाळपासूनच धडपड सुरू होती. मोठ्या गावात पदयात्रा, थेट गाठीभेटी घेतल्या जात होत्या. महिला उमेदवार हळदीकुंकूच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. संक्रांतीच्या तोंडावरच मतदान होत असल्याने यंदा मतदारांची संक्रांत अधिकच गोड होणार आहे.

सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने आरक्षण नेमके काय पडणार याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.

नात्यागोत्यातील राजकारणाने ईर्षा टोकाला

ग्रामपंचायतीचे राजकारण मुळात भाऊबंदकी, नात्यागोत्यातच आडकलेले असते. त्याला ही निवडणूकही अपवाद नाही. अनेक ठिकाणी चुलत भाऊ, चुलते-पुतणे यासह इतर नाती एकमेकांसमोर उभे असल्याने ईर्षा टोकाला पोहोचली आहे.

मतदान देतो; पण आता थांबा

निवडणुकीत टोकाची ईर्षा असल्याने उमेदवार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रभागातून हलत नाही. छोट्या प्रभागात तर उमेदवार मतदारांच्या घरात दिवसातून तीन वेळा जात आहे. भेटेल तिथे मतदारांचे पाय धरून विनवणी केली जात असल्याने मतदान देतो बाबा; पण आता थांब म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.