शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

ग्रामपंचायत प्रचाराचा सुपर संडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीतच उमेदवारांचा दिवस गेला. प्रत्येक गावात जेवणावळीचा धडाका सुरू असून धाबे, हॉटेल फुल दिसत आहेत. ज्या ठिकाणी हायहोल्टेज लढती आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी’ दर्शन सुरू आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती, त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८६ ग्रामपंचायतींसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक सोयीच्या आघाड्यांमध्येच लढती होत आहेत. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जेवणावळीचा धडाका सुरू असल्याने धाबे, हॉटेल फुल झाली आहेत. तरुणांना रोज जेवणाचे कूपन दिले जातात, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. महिला व वयोवृद्ध मतदारांसाठी जेवणाची पार्सल पोहोच होते. रोज जेवणावळी सुरू असल्याने अनेक घरांत एक वेळचे जेवणच तयार करावे लागल्याचे चित्र आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व शहराच्या शेजारील गावात तर हायहोल्टेज लढती पाहावयास मिळत आहेत. येथे जेवणावळीबरोबरच मतदारांना रोज ‘लक्ष्मी’ दर्शन होत आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीसाठी उमेदवारांची सकाळपासूनच धडपड सुरू होती. मोठ्या गावात पदयात्रा, थेट गाठीभेटी घेतल्या जात होत्या. महिला उमेदवार हळदीकुंकूच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. संक्रांतीच्या तोंडावरच मतदान होत असल्याने यंदा मतदारांची संक्रांत अधिकच गोड होणार आहे.

सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने आरक्षण नेमके काय पडणार याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.

नात्यागोत्यातील राजकारणाने ईर्षा टोकाला

ग्रामपंचायतीचे राजकारण मुळात भाऊबंदकी, नात्यागोत्यातच आडकलेले असते. त्याला ही निवडणूकही अपवाद नाही. अनेक ठिकाणी चुलत भाऊ, चुलते-पुतणे यासह इतर नाती एकमेकांसमोर उभे असल्याने ईर्षा टोकाला पोहोचली आहे.

मतदान देतो; पण आता थांबा

निवडणुकीत टोकाची ईर्षा असल्याने उमेदवार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रभागातून हलत नाही. छोट्या प्रभागात तर उमेदवार मतदारांच्या घरात दिवसातून तीन वेळा जात आहे. भेटेल तिथे मतदारांचे पाय धरून विनवणी केली जात असल्याने मतदान देतो बाबा; पण आता थांब म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.