शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

ग्रामपंचायत प्रचाराचा सुपर संडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीतच उमेदवारांचा दिवस गेला. प्रत्येक गावात जेवणावळीचा धडाका सुरू असून धाबे, हॉटेल फुल दिसत आहेत. ज्या ठिकाणी हायहोल्टेज लढती आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी’ दर्शन सुरू आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती, त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८६ ग्रामपंचायतींसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक सोयीच्या आघाड्यांमध्येच लढती होत आहेत. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जेवणावळीचा धडाका सुरू असल्याने धाबे, हॉटेल फुल झाली आहेत. तरुणांना रोज जेवणाचे कूपन दिले जातात, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. महिला व वयोवृद्ध मतदारांसाठी जेवणाची पार्सल पोहोच होते. रोज जेवणावळी सुरू असल्याने अनेक घरांत एक वेळचे जेवणच तयार करावे लागल्याचे चित्र आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व शहराच्या शेजारील गावात तर हायहोल्टेज लढती पाहावयास मिळत आहेत. येथे जेवणावळीबरोबरच मतदारांना रोज ‘लक्ष्मी’ दर्शन होत आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीसाठी उमेदवारांची सकाळपासूनच धडपड सुरू होती. मोठ्या गावात पदयात्रा, थेट गाठीभेटी घेतल्या जात होत्या. महिला उमेदवार हळदीकुंकूच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. संक्रांतीच्या तोंडावरच मतदान होत असल्याने यंदा मतदारांची संक्रांत अधिकच गोड होणार आहे.

सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने आरक्षण नेमके काय पडणार याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.

नात्यागोत्यातील राजकारणाने ईर्षा टोकाला

ग्रामपंचायतीचे राजकारण मुळात भाऊबंदकी, नात्यागोत्यातच आडकलेले असते. त्याला ही निवडणूकही अपवाद नाही. अनेक ठिकाणी चुलत भाऊ, चुलते-पुतणे यासह इतर नाती एकमेकांसमोर उभे असल्याने ईर्षा टोकाला पोहोचली आहे.

मतदान देतो; पण आता थांबा

निवडणुकीत टोकाची ईर्षा असल्याने उमेदवार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रभागातून हलत नाही. छोट्या प्रभागात तर उमेदवार मतदारांच्या घरात दिवसातून तीन वेळा जात आहे. भेटेल तिथे मतदारांचे पाय धरून विनवणी केली जात असल्याने मतदान देतो बाबा; पण आता थांब म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.