शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

By admin | Updated: March 17, 2017 23:30 IST

कऱ्हाडनजीक ‘भाकरीचं गाव’ : महिलांना मिळतोय रोजगार; पन्नास कुटुंबांचा व्यवसाय; यात्रा, कार्यक्रमात पोहोचविल्या जातात भाकरी

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेलीरोजगार निर्माण करताना तो टिकाऊ आणि लोकांच्या गरजेचा असावा लागतो. तसेच उत्पादीत मालासाठी हमखास मार्केट असावे लागते. मात्र, स्पर्धेमध्ये उतरताना अनेकांना या गोष्टी जमत नाहीत. परिणामी, संबंधित रोजगार बंद होतो. पार्ले, ता. कऱ्हाड येथील सुंदरनगरच्या महिलांनी मात्र घरातच रोजगाराची संधी उपलब्ध केली असून, या महिलांनी तयार केलेल्या भाकरी आता इतर राज्यांतही पोहोचत आहेत.बनवडीतील काही कुटुंबांचे दहा वर्षांपूर्वी स्थलांतर करून पार्ले हद्दीमध्ये शासनाने त्यांना जागा देऊन पुनर्वसन केले. या कुटुंबांनी या परिसराला ‘सुंदरनगर’ असे नाव दिले. सध्या या सुंदरनगरमध्ये पन्नास कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लोकांचा रोजंदारी हाच मुख्य व्यवसाय होता; पण अलीकडच्या काळात येथील महिला भाकरी करून देण्याचे काम करू लागल्याने या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते. सुंदरनगरमध्ये तयार झालेल्या भाकरीला सध्या मोठी मागणी आहे. काही महिलांनी विद्यानगर, सैदापूर येथे खाणावळी सुरू केल्या आहेत. तर काही महिला कऱ्हाड तालुक्यात एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाकरी करून देण्याचे काम करत आहेत. गावोगावच्या यात्रा, राजकीय कार्मक्रम आदी ठिकाणी भाकरी करून देण्याचे काम या महिला करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवारसह काही महिला घरातच भाकरी तयार करून देत आहेत. या बाजरीच्या भाकरी सहलीसाठी, देवदर्शनाला जाताना लोक घेऊन जात आहेत. शाळूच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीला चांगली मागणी आहे. बाजरीची भाकरी एक महिन्यापर्यंत टिकते. याशिवाय प्रवासातही ही भाकरी आरोग्यदायी ठरते. या भाकरी कागदासारख्या असून, त्या वाळल्यानंतरही चवदार लागतात. भाकरीसोबत लक्ष्मी पवार शेंगदाणा चटणी आणि खर्डा करून देत आहेत. या सर्व गोष्टी टिकाऊ आणि चवीला असल्याने बाहेरगावी फिरायला जाणारे लोक त्यांच्याकडून भाकरी घेऊन जात आहेत. तिरुपती बालाजी, तुळजापूर, कोकण, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणी सुंदरनगरच्या भाकरी जाऊ लागल्या आहेत. लक्ष्मी पवार यांची स्वत:ची पिठाची गिरण असून, त्या स्वत: दळण दळून भाकरी तयार करतात. पिठामध्ये चवीपुरते मीठ त्या टाकतात. तसेच तिळाचाही त्या समावेश करतात. गरम पाणी ओतून पीठ मळायचे व चुलीवर भाकरी करायच्या, असा त्यांचा दिनक्रम आहे.एक किलो बाजरीच्या पिठात तीस भाकरी तयार होतात. तर इतर ठिकाणी भाकरी करण्यासाठी गेल्यास नगावर किंवा हजेरीवर भाकरी करून दिल्या जातात. ओगलेवाडी, मसूर, उंडाळे, बनवडी, कोपर्डे हवेली, पार्ले, नडशी, कऱ्हाड, मलकापूर, शिरवडे, शहापूर, वडोली निळेश्वर आदींसह गावातील लोक येथील भाकरी टिकाऊ आणि चवीला असल्याने घेऊन जात आहेत. स्वच्छतेला अधिक महत्त्वबाजरीची भाकरी कागदासारखी पातळ असते. वाळल्यानंतर तिची चव चांगली लागते. खर्डा आणि दही याबरोबर भाकरीला चांगली चव येते. भाकरी चुलीवर भाजल्याने चवीत आणखीनच भर पडते. परिसरासह तालुक्यातील अनेक गावांतील लोक येथून भाकरी घेऊन जातात. सुंदरनगरमधील महिला स्वच्छतेला अधिक प्राधान्य देतात. तसेच भाकरीसाठी येथे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही करावे लागते, हे विशेष.चवीसोबत आयुर्वेदिक महत्त्वहीबाजरीची भाकरी चुलीवर बनवताना वीटा, दगडाची चूल बनविली जाते. तसेच भाकरी भाजण्यासाठी लिंबाचे जळण वापरले जाते. लिंबाच्या जळणावर तयार केलेल्या स्वयंपाकाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चवीसाठी आणि आरोग्यासाठीही या भाकरी उपयुक्त आहेत. परिसरातील काहीजण महिलांना भाकरी भाजण्यासाठी स्वत:हून जळण पुरवतात.