शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरनगरची भाकरी पोहोचली तिरुपतीला

By admin | Updated: March 17, 2017 23:30 IST

कऱ्हाडनजीक ‘भाकरीचं गाव’ : महिलांना मिळतोय रोजगार; पन्नास कुटुंबांचा व्यवसाय; यात्रा, कार्यक्रमात पोहोचविल्या जातात भाकरी

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेलीरोजगार निर्माण करताना तो टिकाऊ आणि लोकांच्या गरजेचा असावा लागतो. तसेच उत्पादीत मालासाठी हमखास मार्केट असावे लागते. मात्र, स्पर्धेमध्ये उतरताना अनेकांना या गोष्टी जमत नाहीत. परिणामी, संबंधित रोजगार बंद होतो. पार्ले, ता. कऱ्हाड येथील सुंदरनगरच्या महिलांनी मात्र घरातच रोजगाराची संधी उपलब्ध केली असून, या महिलांनी तयार केलेल्या भाकरी आता इतर राज्यांतही पोहोचत आहेत.बनवडीतील काही कुटुंबांचे दहा वर्षांपूर्वी स्थलांतर करून पार्ले हद्दीमध्ये शासनाने त्यांना जागा देऊन पुनर्वसन केले. या कुटुंबांनी या परिसराला ‘सुंदरनगर’ असे नाव दिले. सध्या या सुंदरनगरमध्ये पन्नास कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लोकांचा रोजंदारी हाच मुख्य व्यवसाय होता; पण अलीकडच्या काळात येथील महिला भाकरी करून देण्याचे काम करू लागल्याने या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाल्याचे दिसून येते. सुंदरनगरमध्ये तयार झालेल्या भाकरीला सध्या मोठी मागणी आहे. काही महिलांनी विद्यानगर, सैदापूर येथे खाणावळी सुरू केल्या आहेत. तर काही महिला कऱ्हाड तालुक्यात एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाकरी करून देण्याचे काम करत आहेत. गावोगावच्या यात्रा, राजकीय कार्मक्रम आदी ठिकाणी भाकरी करून देण्याचे काम या महिला करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवारसह काही महिला घरातच भाकरी तयार करून देत आहेत. या बाजरीच्या भाकरी सहलीसाठी, देवदर्शनाला जाताना लोक घेऊन जात आहेत. शाळूच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीला चांगली मागणी आहे. बाजरीची भाकरी एक महिन्यापर्यंत टिकते. याशिवाय प्रवासातही ही भाकरी आरोग्यदायी ठरते. या भाकरी कागदासारख्या असून, त्या वाळल्यानंतरही चवदार लागतात. भाकरीसोबत लक्ष्मी पवार शेंगदाणा चटणी आणि खर्डा करून देत आहेत. या सर्व गोष्टी टिकाऊ आणि चवीला असल्याने बाहेरगावी फिरायला जाणारे लोक त्यांच्याकडून भाकरी घेऊन जात आहेत. तिरुपती बालाजी, तुळजापूर, कोकण, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणी सुंदरनगरच्या भाकरी जाऊ लागल्या आहेत. लक्ष्मी पवार यांची स्वत:ची पिठाची गिरण असून, त्या स्वत: दळण दळून भाकरी तयार करतात. पिठामध्ये चवीपुरते मीठ त्या टाकतात. तसेच तिळाचाही त्या समावेश करतात. गरम पाणी ओतून पीठ मळायचे व चुलीवर भाकरी करायच्या, असा त्यांचा दिनक्रम आहे.एक किलो बाजरीच्या पिठात तीस भाकरी तयार होतात. तर इतर ठिकाणी भाकरी करण्यासाठी गेल्यास नगावर किंवा हजेरीवर भाकरी करून दिल्या जातात. ओगलेवाडी, मसूर, उंडाळे, बनवडी, कोपर्डे हवेली, पार्ले, नडशी, कऱ्हाड, मलकापूर, शिरवडे, शहापूर, वडोली निळेश्वर आदींसह गावातील लोक येथील भाकरी टिकाऊ आणि चवीला असल्याने घेऊन जात आहेत. स्वच्छतेला अधिक महत्त्वबाजरीची भाकरी कागदासारखी पातळ असते. वाळल्यानंतर तिची चव चांगली लागते. खर्डा आणि दही याबरोबर भाकरीला चांगली चव येते. भाकरी चुलीवर भाजल्याने चवीत आणखीनच भर पडते. परिसरासह तालुक्यातील अनेक गावांतील लोक येथून भाकरी घेऊन जातात. सुंदरनगरमधील महिला स्वच्छतेला अधिक प्राधान्य देतात. तसेच भाकरीसाठी येथे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही करावे लागते, हे विशेष.चवीसोबत आयुर्वेदिक महत्त्वहीबाजरीची भाकरी चुलीवर बनवताना वीटा, दगडाची चूल बनविली जाते. तसेच भाकरी भाजण्यासाठी लिंबाचे जळण वापरले जाते. लिंबाच्या जळणावर तयार केलेल्या स्वयंपाकाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चवीसाठी आणि आरोग्यासाठीही या भाकरी उपयुक्त आहेत. परिसरातील काहीजण महिलांना भाकरी भाजण्यासाठी स्वत:हून जळण पुरवतात.