शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

वाळू, वाहतूक, प्रदूषणावर शिरोळची आमसभा गाजली

By admin | Updated: January 8, 2016 01:05 IST

शासकीय अधिकारी धारेवर : कोल्हापूर व इचलकरंजी पालिकेवर कारवाईचा ठराव

शिरोळ : संभाव्य पाणीटंचाई व कमी पाऊसमान असल्याने यावर्षी शासनाने केलेला वाळू लिलाव रद्द करावा, अशी मागणी करीत वाळू उपसा, रस्त्याची चाळण थांबवावी, प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांचे वीज कनेक्शन तोडावीत, सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प न बसविल्यास कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी पालिकेवर कारवाई करा, असा ठराव शिरोळच्या आमसभेत गुरुवारी झाला. आठ तास सभा चालली.दरम्यान, शासनाने ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिलापोटी कनेक्शन तोडण्याचा आदेश दिलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडू नये, असाही ठराव केला. सभेत ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय, प्रदूषण मंडळ, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा यासह काही खाते प्रमुखांच्या असमाधानकारक उत्तरावर तक्रारदार ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील पंचायत समिती सभागृहात आमदार उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, अनिल यादव, सीमा पाटील, वैशाली देवताळे, विजय भोजे, भोला तकडे, धनाजी जगदाळे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, विकास कांबळे, इंद्रायणी पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. पंचायत समितीचे सभापती देवताळे यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी देसाई यांनी अहवालवाचन केले. वीज विभागाच्या गलथान कारभारामुळेच शॉर्टसर्किट होऊन हजारो एकर ऊस पिकाचे नुकसान होते, अशी माहिती देऊन ‘स्वाभिमानी’चे बंडू पाटील विश्वास बालिघाटे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. सभेत आप्पा पाटील, प्रसाद धर्माधिकारी, धनाजी चुडमुंगे, अभिजित जगदाळे, संजय शिंदे, संभाजीराजे नाईक, पोपट खोत, अन्वर जमादार, महेश पाटील, मल्लाप्पा चौगुले यांनी प्रश्न मांडले. (प्रतिनिधी)आमसभेत निलंबनाचा ठरावझीज झालेले खांब व तारा बदलण्याची मागणी सदाशिव आंबी यांनी केली. तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत बैठक लावावी, जे ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत याबाबत कार्यवाही व्हावी, डोनेशन घेणाऱ्या अनुदानित शाळांवर कारवाई करणे, आमसभेला गैरहजर राहणारे वीज वितरणचे काळे यांना निलंबित करण्याचा ठरावही या आमसभेत करण्यात आला. आॅनलाईन सातबारा१५ जानेवारीपासून आॅनलाईन सात-बारा शेतकऱ्यांना मिळणार असून, सुमारे दोन हजार विभक्त रेशनकार्ड दिल्यामुळे १५ हजार कुटुंबाचा वाद थांबला असल्याचे तहसीलदार गिरी यांनी सांगितले.