शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू, वाहतूक, प्रदूषणावर शिरोळची आमसभा गाजली

By admin | Updated: January 8, 2016 01:05 IST

शासकीय अधिकारी धारेवर : कोल्हापूर व इचलकरंजी पालिकेवर कारवाईचा ठराव

शिरोळ : संभाव्य पाणीटंचाई व कमी पाऊसमान असल्याने यावर्षी शासनाने केलेला वाळू लिलाव रद्द करावा, अशी मागणी करीत वाळू उपसा, रस्त्याची चाळण थांबवावी, प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांचे वीज कनेक्शन तोडावीत, सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प न बसविल्यास कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी पालिकेवर कारवाई करा, असा ठराव शिरोळच्या आमसभेत गुरुवारी झाला. आठ तास सभा चालली.दरम्यान, शासनाने ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिलापोटी कनेक्शन तोडण्याचा आदेश दिलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडू नये, असाही ठराव केला. सभेत ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय, प्रदूषण मंडळ, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा यासह काही खाते प्रमुखांच्या असमाधानकारक उत्तरावर तक्रारदार ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील पंचायत समिती सभागृहात आमदार उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, अनिल यादव, सीमा पाटील, वैशाली देवताळे, विजय भोजे, भोला तकडे, धनाजी जगदाळे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, विकास कांबळे, इंद्रायणी पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. पंचायत समितीचे सभापती देवताळे यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी देसाई यांनी अहवालवाचन केले. वीज विभागाच्या गलथान कारभारामुळेच शॉर्टसर्किट होऊन हजारो एकर ऊस पिकाचे नुकसान होते, अशी माहिती देऊन ‘स्वाभिमानी’चे बंडू पाटील विश्वास बालिघाटे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. सभेत आप्पा पाटील, प्रसाद धर्माधिकारी, धनाजी चुडमुंगे, अभिजित जगदाळे, संजय शिंदे, संभाजीराजे नाईक, पोपट खोत, अन्वर जमादार, महेश पाटील, मल्लाप्पा चौगुले यांनी प्रश्न मांडले. (प्रतिनिधी)आमसभेत निलंबनाचा ठरावझीज झालेले खांब व तारा बदलण्याची मागणी सदाशिव आंबी यांनी केली. तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत बैठक लावावी, जे ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत याबाबत कार्यवाही व्हावी, डोनेशन घेणाऱ्या अनुदानित शाळांवर कारवाई करणे, आमसभेला गैरहजर राहणारे वीज वितरणचे काळे यांना निलंबित करण्याचा ठरावही या आमसभेत करण्यात आला. आॅनलाईन सातबारा१५ जानेवारीपासून आॅनलाईन सात-बारा शेतकऱ्यांना मिळणार असून, सुमारे दोन हजार विभक्त रेशनकार्ड दिल्यामुळे १५ हजार कुटुंबाचा वाद थांबला असल्याचे तहसीलदार गिरी यांनी सांगितले.