शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

उन्हाळा घरातच, उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने यावेळी मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवलाच नाही, याउलट मार्चअखेर ते एप्रिलच्या पंधरवड्यात चाळिशीपार केलेल्या तापमानामुळे कोल्हापूरकर होरपळले. तरीदेखील उष्माघातासारख्या आपत्तीला काेणीही बळी पडले नाही, हे विशेष.

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरुवातीला विकेंड, नंतर वेळ पाळून निर्बंध आणि त्यानंतर आता शंभर टक्के अशा तीन टप्प्यांत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. साधारणपणे हा काळ कडक उन्हाळ्याचा असतो. ऊन मी म्हणत असते. उष्णतेची लाट येते; पण नेमके याचवेळी लॉकडाऊन झाल्याने लोक बऱ्यापैकी घरातच राहिल्याने उष्माघात होण्याइतपत तीव्रता जाणवली नाही.

साधारणपणे मे महिन्यात उष्णतेची लाट येते; पण जिल्ह्यात ती मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आली. तापमानाचा पारा चाळीसवरून ४१ पर्यंत झेपावले. ही लाट आणखी तीव्र होईल असा इशारा हवामान खात्यानेही दिला होता. तथापि, २० एप्रिलनंतर वादळी पावसाचे वातावरण सुरू झाले. २५ एप्रिलपासून वादळांचा जोर वाढला. आधी अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळ यामुळे पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. आठ दिवसांचा कालावधी गृहीत धरला त्यातील पाच दिवस दुपारनंतर हमखास पाऊस पडणारेच ठरले आहेत, तर दोन तीन दिवसच कडक ऊन पडते. त्यातही ढगाळ वातावरण असल्याने त्याची फारशी तीव्रता जाणवत नाही.

चौकट ०१

मार्च, एप्रिलपेक्षा मे महिन्यातील तापमान कमी

जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील सरासरी तापमान पाहिले तर एप्रिलमधील तापमान मे महिन्यापेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ३९, तर मे महिन्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. यावर्षी एप्रिलमध्ये सरासरी ३८ ते ४० आणि एक-दोन दिवशी ४२ वर पोहोचले होते. मे महिन्यातील कमाल तापमान ३५ पर्यंतच राहिले आहे.

चौकट ०२

एकही मृत्यू नाही

उष्माघातामुळे गेल्या तीन वर्षांत एकही बळी गेलेला नाही. यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका फिरस्त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; पण त्याची नोंद घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे नोंद असल्याने हा अधिकृत मृत्यू धरता येत नाही.