शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

उन्हाळा घरातच, उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने यावेळी मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवलाच नाही, याउलट मार्चअखेर ते एप्रिलच्या पंधरवड्यात चाळिशीपार केलेल्या तापमानामुळे कोल्हापूरकर होरपळले. तरीदेखील उष्माघातासारख्या आपत्तीला काेणीही बळी पडले नाही, हे विशेष.

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरुवातीला विकेंड, नंतर वेळ पाळून निर्बंध आणि त्यानंतर आता शंभर टक्के अशा तीन टप्प्यांत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. साधारणपणे हा काळ कडक उन्हाळ्याचा असतो. ऊन मी म्हणत असते. उष्णतेची लाट येते; पण नेमके याचवेळी लॉकडाऊन झाल्याने लोक बऱ्यापैकी घरातच राहिल्याने उष्माघात होण्याइतपत तीव्रता जाणवली नाही.

साधारणपणे मे महिन्यात उष्णतेची लाट येते; पण जिल्ह्यात ती मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आली. तापमानाचा पारा चाळीसवरून ४१ पर्यंत झेपावले. ही लाट आणखी तीव्र होईल असा इशारा हवामान खात्यानेही दिला होता. तथापि, २० एप्रिलनंतर वादळी पावसाचे वातावरण सुरू झाले. २५ एप्रिलपासून वादळांचा जोर वाढला. आधी अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळ यामुळे पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. आठ दिवसांचा कालावधी गृहीत धरला त्यातील पाच दिवस दुपारनंतर हमखास पाऊस पडणारेच ठरले आहेत, तर दोन तीन दिवसच कडक ऊन पडते. त्यातही ढगाळ वातावरण असल्याने त्याची फारशी तीव्रता जाणवत नाही.

चौकट ०१

मार्च, एप्रिलपेक्षा मे महिन्यातील तापमान कमी

जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील सरासरी तापमान पाहिले तर एप्रिलमधील तापमान मे महिन्यापेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ३९, तर मे महिन्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. यावर्षी एप्रिलमध्ये सरासरी ३८ ते ४० आणि एक-दोन दिवशी ४२ वर पोहोचले होते. मे महिन्यातील कमाल तापमान ३५ पर्यंतच राहिले आहे.

चौकट ०२

एकही मृत्यू नाही

उष्माघातामुळे गेल्या तीन वर्षांत एकही बळी गेलेला नाही. यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका फिरस्त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; पण त्याची नोंद घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे नोंद असल्याने हा अधिकृत मृत्यू धरता येत नाही.