शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा घरातच, उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कडक होत गेल्याने यावेळचा उन्हाळा बऱ्यापैकी घरातच गेला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने यावेळी मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवलाच नाही, याउलट मार्चअखेर ते एप्रिलच्या पंधरवड्यात चाळिशीपार केलेल्या तापमानामुळे कोल्हापूरकर होरपळले. तरीदेखील उष्माघातासारख्या आपत्तीला काेणीही बळी पडले नाही, हे विशेष.

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरुवातीला विकेंड, नंतर वेळ पाळून निर्बंध आणि त्यानंतर आता शंभर टक्के अशा तीन टप्प्यांत जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. साधारणपणे हा काळ कडक उन्हाळ्याचा असतो. ऊन मी म्हणत असते. उष्णतेची लाट येते; पण नेमके याचवेळी लॉकडाऊन झाल्याने लोक बऱ्यापैकी घरातच राहिल्याने उष्माघात होण्याइतपत तीव्रता जाणवली नाही.

साधारणपणे मे महिन्यात उष्णतेची लाट येते; पण जिल्ह्यात ती मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आली. तापमानाचा पारा चाळीसवरून ४१ पर्यंत झेपावले. ही लाट आणखी तीव्र होईल असा इशारा हवामान खात्यानेही दिला होता. तथापि, २० एप्रिलनंतर वादळी पावसाचे वातावरण सुरू झाले. २५ एप्रिलपासून वादळांचा जोर वाढला. आधी अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळ यामुळे पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. आठ दिवसांचा कालावधी गृहीत धरला त्यातील पाच दिवस दुपारनंतर हमखास पाऊस पडणारेच ठरले आहेत, तर दोन तीन दिवसच कडक ऊन पडते. त्यातही ढगाळ वातावरण असल्याने त्याची फारशी तीव्रता जाणवत नाही.

चौकट ०१

मार्च, एप्रिलपेक्षा मे महिन्यातील तापमान कमी

जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील सरासरी तापमान पाहिले तर एप्रिलमधील तापमान मे महिन्यापेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ३९, तर मे महिन्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. यावर्षी एप्रिलमध्ये सरासरी ३८ ते ४० आणि एक-दोन दिवशी ४२ वर पोहोचले होते. मे महिन्यातील कमाल तापमान ३५ पर्यंतच राहिले आहे.

चौकट ०२

एकही मृत्यू नाही

उष्माघातामुळे गेल्या तीन वर्षांत एकही बळी गेलेला नाही. यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका फिरस्त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; पण त्याची नोंद घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे नोंद असल्याने हा अधिकृत मृत्यू धरता येत नाही.