शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बॅँकेला समन्स ¨जिल्हा उपनिबंधकांचे खरमरीत पत्र : कर्जमाफी प्रकरणातील दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:23 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पिवळी यादी येऊन सहा दिवस झाले तरी पडताळणीचे काम संथगतीने करणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी समन्स दिले

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पिवळी यादी येऊन सहा दिवस झाले तरी पडताळणीचे काम संथगतीने करणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी समन्स दिले. कर्जमाफीच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी बॅँकेची असतानाही त्यांनी एकूणच या कामामध्ये सहकार विभागाला अपेक्षित सहकार्य न केल्याने राज्य पातळीवर कोल्हापूरची प्रतिमा काहीशी मलिन झाली आहे.

कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यापासून ती नेहमी चर्चेत राहिली आहे. याद्यांतील घोळाने कहरच केला आहे. यात थेट आमदार व माजी खासदारांची नावेही आल्याने राज्य सरकारच्या आयटी विभागाचे अक्षरश: वाभाडे निघाले आहेत.राज्य पातळीवर आयटी विभाग, तर जिल्हा पातळीवर जिल्हा बॅँकेचे कामकाज चांगलेच चर्चेत राहिले. पात्र, अपात्र नावांचा गुंता निर्माण झाला असताना, जिल्हा बॅँकेच्या पातळीवर ज्या पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित होते, ते झालेले नाही. मध्यंतरी डाटा अपडेट करण्याचे काम जिल्हा बॅँकेत सुरू होते. त्यावेळी तर कमालीचा गोंधळ सुरू होता. बहुतांश जिल्'ांचा डाटा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. कोल्हापूर जिल्ह्याचेकाम पिछाडीवर राहिले होते. सचिवव आयुक्तांनी बॅँक प्रशासनासह सहकार विभागाची कानउघाडणी केली होती.

आता ५३ हजार ८८६ खातेदारांची पिवळी यादी गुरुवारी (दि. ११) जिल्हा बॅँकेकडे आली आहे. डाटाभरताना दिनांकाच्या ठिकाणी महिना आणि महिन्याच्या ठिकाणी दिनांक झाल्याने निकषानुसार काहीजण अपात्र ठरत आहेत. त्या माहितीची छाननी करण्याचे काम जिल्हा बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. या डाटाबाबत वरिष्ठ पातळीवरून रोज आढावा घेतला जातो; त्यामुळे किती खात्यांचे काम पूर्ण झाले याचे अपडेट जिल्हा उपनिबंधकांना असणे गरजेचे आहे. म्हणून रोज याबाबतची माहिती देण्याची सूचना दिलेली आहे; पण बॅँकेकडून सहा दिवसांत केवळ काम सुरू आहे, एवढीच माहिती सहकार विभागाला दिली जात असल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालय अडचणीत सापडले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सतत विचारणा होत असल्याने मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बॅँकेला समन्स बजावले आहे. माहिती वेळेत दिली नाही तर बॅँकेविरोधात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.आर्थिक वर्षाचा घोळराज्य सरकारच्या कर्जमाफीत आर्थिक वर्ष व ऊस उत्पादक शेतकºयांचे कर्ज उचलीचा कालावधी यामध्ये घोळ झाला आहे. ज्यांनी सन २०१४-१५ मध्ये मार्चपूर्वी आणि सन २०१५-१६ मध्ये एप्रिलनंतर उचल केली ते शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू लागले आहेत. मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील काळम्मादेवी विकास संस्थेचे शंभराहून अधिक शेतकºयांना या जाचक अटीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष ठरविताना एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष कर्ज उचल व परतफेडीसाठी धरले आहे; पण ऊस उत्पादक शेतकºयांचे विकास सेवा संस्थांच्या पातळीवर जूनपर्यंत उचल व परतफेडीचे वर्ष असते. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सन २०१४-१५ मध्ये मार्चपूर्वी आणि सन २०१५-१६ मध्ये एप्रिलनंतर उचल केली ते शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू लागले आहेत.सरकारने निकषांत बदल करून लाभ द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.