शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

बिळाशीत शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2017 20:37 IST

शिराळा तालुक्यातील पहिली घटना : आठ लाखांचे कर्ज

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील शेतकरी यशवंत शंकर साळुंखे (वय ५५) यांनी सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कर्जाला कंटाळून गावातील वारणा चौकातील आडात उडी मारून आत्महत्या केली. शेतीसाठी घेतलेले सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज चुकवता न आल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केलेली ही आत्महत्या शिराळा तालुक्यातील पहिलीच घटना ठरली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यशवंत साळुंखे यांनी बँक आॅफ बडोदाच्या वाळवा शाखेतून सात लाख रुपये तसेच बिळाशी येथील सोसायटीकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांची वडिलार्जित साडेचार एकर जमीन असून, एकत्रित कुटुंबाचे ते प्रमुख होते. त्यांचे आई, वडील वृध्द असून, ते घरातून बाहेर पडू शकत नाहीत. मुलगा बी. ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे, तर मुलगी दीपाली हिचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. गेले महिनाभर यशवंत साळुंखे कर्जबाजारीपणामुळे नैराश्येत होते. कर्ज कसे फेडायचे आणि दारिद्र्य कधी संपायचे या विचारात ते पत्नीशी बोलायचे. ते सतत एकटेच बडबडत. सोमवारी सकाळी त्यांनी आठच्या सुमारास आडात उडी मारली. साळुंखे यांनी ज्या आडात उडी मारली, त्याला स्लॅब बांधण्यात आला आहे. ३ फूट बाय ३ फूट रुंदीचा दरवाजा ठेवला असून, यातून ग्रामस्थ पाणी उपसतात. या दरवाजातूनच साळुंखे यांनी आत उडी मारली. साळुंखे यांनी आडात उडी घेतल्याचे समजताच त्यांना वाचविण्यासाठी प्रवीण यमगर, संभाजी साळुंखे यांनी आडात उड्या मारल्या. परंतु आडात पाणी जास्त असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले. ८० फूट खोल असणाऱ्या आडातील पाणी काढण्यासाठी दोन विद्युत पंप लावण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आडातील सर्व पाणी काढल्यानंतर साळुंखे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साळुंखे येथील वारणा गणेश मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. चुलत बंधू विजय बाळकृष्ण साळुंखे यांनी कोकरुड पोलिसांत माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर) गोठ्यात गाय, तर घरात आय पाहिजे! शेतीवाडीबरोबरच साळुंखे यांना खिलार गाय पाळण्याचा छंद होता. ‘गोठ्यात गाय, तर घरात आय पाहिजे, मग घरबी भरल्यासारखं आणि गोठाबी भरल्यासारखा...’ असे म्हणणाऱ्या यशवंत साळुंखे यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.