शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणानेच आत्महत्या : हसन मुश्रीफ

By admin | Updated: June 10, 2017 15:58 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा १८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १0 :राज्यातील भाजप सरकारच्या तीन वर्षातील कारभार हा शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागून आत्महत्येकडे वळला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे केली.

ताराबाई पार्क येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण व केक कापुन वर्धापन दिन साजरा करणेत आला. यावेळी राज्यातील भाजपा सरकारच्या शेतकरी कारभाराचा समाचार घेत हसन मुश्रीफ यांनी कडाडून टिका केली.

मुश्रीफ म्हणाले, या पुरोगामी महाराष्ट्रात शेतकरी कधी संपावर गेले नव्हते, पण ते ही घडत आहे ही लाजीरवाणी घटना आहे. राज्याच्या सरकारच्या तीन वर्षाच्या काळातील शेतकरी विरोधी कारभाराने शेतकरी कष्टकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळेच आत्महत्येकडे वळला आहे. नोटबंदीच्या निणर्यामुळे शेतमालाचे दर कोसळले, गारपीट, निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे न्यायासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा असुन हा वर्धापनदिन शेतकऱ्यांना समर्पित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष मा ए वाय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -असुर्लेकर, अमरसिंह माने पाटील, सर्जेराव पाटील गवशीकर , नेताजीराव पाटील, प्रकाश पाटील, डी बी पिष्ठे, बाळासाहेब खैरे, संगीता खाडे, संतोष धुमाळ, शिवानंद माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.