शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

उसाची वाहतूक बनतेय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

सरदार चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे : रस्त्याला कडेला उसाने भरलेल्या ट्राॅलीला धडकून जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघात होत आहेत. काही ठिकाणी ...

सरदार चौगुले,

पोर्ले तर्फ ठाणे : रस्त्याला कडेला उसाने भरलेल्या ट्राॅलीला धडकून जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघात होत आहेत. काही ठिकाणी दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला; तर काहीजण जायबंद झाले आहेत. तरीही रस्त्याच्या कडेला वाहन लावण्याचा खटाटोप काही कमी होत नाही.

रस्ते वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत बेजबाबदारपणे रस्त्याच्या कडेला वाहनतळ बनविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

बैलगाड्यांची संख्या कमी झाल्याने साखर कारखान्यास ट्रक, ट्रॅक्टर-ट्राॅलीने, कार्टिंग वाहनांनी ऊस वाहतूक केली जात आहे. उसाने भरलेले वाहन उसाच्या फडातून बाहेर काढले की थेट कारखान्यात टोकन नंबर काढून ऊस उतण्याची प्रतीक्षा करीत वाहनअड्ड्यात लावले जाते. नंबर कधी येईल याचा नेम नसल्यामुळे आणि रात्री-अपरात्री रस्त्यावर वर्दळ कमी असल्यामुळे वाहनचालक उसाने भरलेले वाहन मुख्य रस्त्याच्या कडेला लावून कारखान्याकडे जातात.

साखर कारखाने रस्ते सुरक्षा उपक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी किंवा रिफ्लेक्टर असलेले कापड लावण्याची मोहीम राबवतात. शिवाय प्रबोधन करीत असतात. रिफ्लेक्टर लावलेल्या पट्ट्या उसाने झाकल्या जातात. सुरक्षेचा भाग म्हणून वाहनाच्या मागे बांधलेले कापड लावलेच जात नाही. त्यामुळे समोरच्या वाहनांना पास देण्यासाठी वेगवान असणारी दुचाकी किंवा वाहन उसाने भरलेल्या वाहनावर धडकते. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे; तर काहीजण जायबंद झाले आहेत. रस्ता सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून लाखमोलाच्या जीवास कारणीभूत ठरणाऱ्या आणि मुख्य रस्त्याला वाहनतळ बनविणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई झाली तरच नाहक जाणाऱ्या बळींची संख्या कमी होईल.

रिफ्लेकटर नसलेल्या वाहनांवर कारवाई

हंगामाच्या सुरुवातीलाच प्रत्येक कारखान्याने ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नाही तर ऊसअड्ड्यात प्रवेश नाही, असा कडक नियम करायला पाहिजे. तसेच वाहतूक यंत्रणेने आणि पोलिसांनी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ती जुजबी नसावी. तसेच रस्त्याच्या कडेला वाहन लावून मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविली पाहिजे.

.........

वादाचे प्रकार

कारखान्यावर लवकर नंबर मिळावा या उद्देशाने ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर स्पर्धा सुरू असते. जागा मिळेल तेथे वाहनांना पास करताना उसाची वाहने झोले खात उलटली आहेत. यामध्ये उलटलेल्या उसाखाली सापडून अनेकांचा जीव गेला आहे. ट्रॅक्टर-ट्राॅलीवाले टेपरेकाॅर्डर लावून मागील वाहनांना पास देत नाहीत. यातून वादाचे अनेक प्रकार घडले आहेत.