शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

‘भोगावती’ कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 00:37 IST

गाळप उद्दिष्टपूर्तीचे आव्हान : कारखाना रूततोय आर्थिक अडचणीत

सुनील चौगले --आमजाई व्हरवडे --देशात एकेकाळी अव्वल स्थानावर असणारा भोगावती साखर कारखाना दोनशे कोटी कर्ज, जादा नोकरभरती यामुळे आर्थिक गाळात रूतला आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी चालू हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर जात असलेला ऊस पाहता पाच लाखांचा टप्पा तरी पूर्ण होणार काय? ही शंका आहे. जर पाच लाख टनांचा टप्पा पूर्ण झाला नाही, तर ‘भोगावती’चा पुढील गळीत हंगाम धोक्यात येऊ शकतो.साठ वर्षांपूर्वी कै. दादासाहेब पाटील (कौलवकर) यांनी भोगावती कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यामुळे बावन्न गावांतील जनता सुखी झाली. त्यांच्या पश्चात (कै.) गोविंदराव कलिकते यांनी कारखान्याचा कारभार चांगला केला. कलिकते यांच्यानंतर सुद्धा दादासाहेबांचे पुत्र दिवंगत आनंदराव पाटील (कौलवकर) यांनी दहा वर्षे कारभार केला. कारखान्याला पुरस्कार मिळाले. मात्र, अलीकडच्या दहा वर्षांच्या राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी कारखान्याला आर्थिक संकटात घातले आहे.कारखान्यावर सध्या दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचा आरोप होत आहे. भोगावतीची जंबो नोकरभरती गाजली. त्यामुळे महिन्याला दोन, सव्वादोन कोटींचा बोजा पडणार आहे. कदाचित राज्यात सर्वाधिक पगार व बोनसवर खर्च होणारा ‘भोगावती’ असेल. दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाने मार्च २०१६ ला भोगावतीवर प्रशासक मंडळ आले.साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासकाच्या नेतृत्वाखाली गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेकांनी या भोगावतीवर स्वार्थ साधला अशी मंडळी सध्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. सध्या भोगावतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे तोडून नेला जात आहे. या कार्यक्षेत्रातील ऊस जिल्ह्यातील सहा कारखान्यांना जात आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी घटले आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता या कारखान्याला साडेपाच लाख टन ऊस गाळप होण्याची गरज आहे. सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून उसाचे गाळप जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे. प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे.