शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

‘भोगावती’ कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 00:37 IST

गाळप उद्दिष्टपूर्तीचे आव्हान : कारखाना रूततोय आर्थिक अडचणीत

सुनील चौगले --आमजाई व्हरवडे --देशात एकेकाळी अव्वल स्थानावर असणारा भोगावती साखर कारखाना दोनशे कोटी कर्ज, जादा नोकरभरती यामुळे आर्थिक गाळात रूतला आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी चालू हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर जात असलेला ऊस पाहता पाच लाखांचा टप्पा तरी पूर्ण होणार काय? ही शंका आहे. जर पाच लाख टनांचा टप्पा पूर्ण झाला नाही, तर ‘भोगावती’चा पुढील गळीत हंगाम धोक्यात येऊ शकतो.साठ वर्षांपूर्वी कै. दादासाहेब पाटील (कौलवकर) यांनी भोगावती कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यामुळे बावन्न गावांतील जनता सुखी झाली. त्यांच्या पश्चात (कै.) गोविंदराव कलिकते यांनी कारखान्याचा कारभार चांगला केला. कलिकते यांच्यानंतर सुद्धा दादासाहेबांचे पुत्र दिवंगत आनंदराव पाटील (कौलवकर) यांनी दहा वर्षे कारभार केला. कारखान्याला पुरस्कार मिळाले. मात्र, अलीकडच्या दहा वर्षांच्या राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी कारखान्याला आर्थिक संकटात घातले आहे.कारखान्यावर सध्या दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचा आरोप होत आहे. भोगावतीची जंबो नोकरभरती गाजली. त्यामुळे महिन्याला दोन, सव्वादोन कोटींचा बोजा पडणार आहे. कदाचित राज्यात सर्वाधिक पगार व बोनसवर खर्च होणारा ‘भोगावती’ असेल. दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाने मार्च २०१६ ला भोगावतीवर प्रशासक मंडळ आले.साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासकाच्या नेतृत्वाखाली गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेकांनी या भोगावतीवर स्वार्थ साधला अशी मंडळी सध्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. सध्या भोगावतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे तोडून नेला जात आहे. या कार्यक्षेत्रातील ऊस जिल्ह्यातील सहा कारखान्यांना जात आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी घटले आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता या कारखान्याला साडेपाच लाख टन ऊस गाळप होण्याची गरज आहे. सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून उसाचे गाळप जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे. प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे.