शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

‘भोगावती’ कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 00:37 IST

गाळप उद्दिष्टपूर्तीचे आव्हान : कारखाना रूततोय आर्थिक अडचणीत

सुनील चौगले --आमजाई व्हरवडे --देशात एकेकाळी अव्वल स्थानावर असणारा भोगावती साखर कारखाना दोनशे कोटी कर्ज, जादा नोकरभरती यामुळे आर्थिक गाळात रूतला आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी चालू हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर जात असलेला ऊस पाहता पाच लाखांचा टप्पा तरी पूर्ण होणार काय? ही शंका आहे. जर पाच लाख टनांचा टप्पा पूर्ण झाला नाही, तर ‘भोगावती’चा पुढील गळीत हंगाम धोक्यात येऊ शकतो.साठ वर्षांपूर्वी कै. दादासाहेब पाटील (कौलवकर) यांनी भोगावती कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यामुळे बावन्न गावांतील जनता सुखी झाली. त्यांच्या पश्चात (कै.) गोविंदराव कलिकते यांनी कारखान्याचा कारभार चांगला केला. कलिकते यांच्यानंतर सुद्धा दादासाहेबांचे पुत्र दिवंगत आनंदराव पाटील (कौलवकर) यांनी दहा वर्षे कारभार केला. कारखान्याला पुरस्कार मिळाले. मात्र, अलीकडच्या दहा वर्षांच्या राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी कारखान्याला आर्थिक संकटात घातले आहे.कारखान्यावर सध्या दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचा आरोप होत आहे. भोगावतीची जंबो नोकरभरती गाजली. त्यामुळे महिन्याला दोन, सव्वादोन कोटींचा बोजा पडणार आहे. कदाचित राज्यात सर्वाधिक पगार व बोनसवर खर्च होणारा ‘भोगावती’ असेल. दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाने मार्च २०१६ ला भोगावतीवर प्रशासक मंडळ आले.साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासकाच्या नेतृत्वाखाली गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेकांनी या भोगावतीवर स्वार्थ साधला अशी मंडळी सध्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. सध्या भोगावतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे तोडून नेला जात आहे. या कार्यक्षेत्रातील ऊस जिल्ह्यातील सहा कारखान्यांना जात आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी घटले आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता या कारखान्याला साडेपाच लाख टन ऊस गाळप होण्याची गरज आहे. सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून उसाचे गाळप जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे. प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे.