शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

महापुरामुळे ऊस उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:00 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट होणार असल्याचा निष्कर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. याचे सादरीकरण गुरुवारी पुण्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ५ ते १५ आॅगस्ट या काळात अभूतपूर्व असा महापूर आला होता. त्यामध्ये तिन्ही जिल्ह्यांतील ४.९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली होती. यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र उसाचे आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पथकांनी या तिन्ही जिल्ह्यांतील पूरबाधित ऊस क्षेत्राची पाहणी करून सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या आधारे काढलेल्या निष्कर्षाचे सादरीकरण शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यामध्ये पूर्णपणे वाया जाणारे ऊस क्षेत्र तसेच अंशत: बाधित क्षेत्राची माहिती देतानाच हा ऊस वाचविण्यासाठी किंवा या पिकावरील संभाव्य रोगराई टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांचाही समावेश होता. महापुरामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होईल. पर्यायाने साखर उत्पादनही ३० टक्क्यांनी घटेल, असा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हे अद्याप अपूर्णहा सर्व्हे अद्याप पूर्ण झालेला नाही. शिरोळ तालुक्यातील दानवाड, खिद्रापूर तसेच जवाहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पुराच्या पाण्याखाली गेलेले ऊसाचे काही क्षेत्र अद्यापही दलदलीचे आहे. त्यामुळे तेथील सर्व्हे पूर्ण होण्यास आणखी आठदहा दिवस लागतील .त्यानंतरच ऊसाच्या नुकसानीचा अंतीम निष्कर्ष सांगता येईल.राज्याचे साखर उत्पादन ६० लाख टनांपर्यत घसरणार२०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. या हंगामात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. दुष्काळामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र यंदा ८ लाख ४३ हजार हेक्टरवर आले आहे. त्यात आता महापुराचा फटका बसला असल्याने त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ६० टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.