शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

महापुरामुळे ऊस उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:00 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट होणार असल्याचा निष्कर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. याचे सादरीकरण गुरुवारी पुण्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ५ ते १५ आॅगस्ट या काळात अभूतपूर्व असा महापूर आला होता. त्यामध्ये तिन्ही जिल्ह्यांतील ४.९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली होती. यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र उसाचे आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पथकांनी या तिन्ही जिल्ह्यांतील पूरबाधित ऊस क्षेत्राची पाहणी करून सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या आधारे काढलेल्या निष्कर्षाचे सादरीकरण शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यामध्ये पूर्णपणे वाया जाणारे ऊस क्षेत्र तसेच अंशत: बाधित क्षेत्राची माहिती देतानाच हा ऊस वाचविण्यासाठी किंवा या पिकावरील संभाव्य रोगराई टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांचाही समावेश होता. महापुरामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होईल. पर्यायाने साखर उत्पादनही ३० टक्क्यांनी घटेल, असा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हे अद्याप अपूर्णहा सर्व्हे अद्याप पूर्ण झालेला नाही. शिरोळ तालुक्यातील दानवाड, खिद्रापूर तसेच जवाहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पुराच्या पाण्याखाली गेलेले ऊसाचे काही क्षेत्र अद्यापही दलदलीचे आहे. त्यामुळे तेथील सर्व्हे पूर्ण होण्यास आणखी आठदहा दिवस लागतील .त्यानंतरच ऊसाच्या नुकसानीचा अंतीम निष्कर्ष सांगता येईल.राज्याचे साखर उत्पादन ६० लाख टनांपर्यत घसरणार२०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. या हंगामात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. दुष्काळामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र यंदा ८ लाख ४३ हजार हेक्टरवर आले आहे. त्यात आता महापुराचा फटका बसला असल्याने त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ६० टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.