शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

ऊस दर आंदोलनास बळ येणार

By admin | Updated: October 23, 2014 22:51 IST

शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या : ‘स्वाभिमानी’सह शिवसेनाही ताकद लावणार

संदीप बावचे - शिरोळ - तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊस दराच्या प्रश्नासाठी ‘स्वाभिमानी’बरोबर शिवसेनेचीही ताकद मिळणार आहे. ऊस चळवळीतून संघर्ष करून उल्हास पाटील यांनी नुकतीच आमदारकी पटकाविली. खा. राजू शेट्टी यांच्यानंतर ऊस चळवळीतील दुसरा नेता आ. पाटील यांच्या रूपातून शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे साहजिकच खासदार आणि आमदार हे दोघेही ऊस दरासाठी झटणार, हे मात्र निश्चित आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, उसाला आधारभूत दर ठरावा, यासाठी राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यात चळवळ उभा केली. शिरोळमधून सुरू झालेल्या या चळवळीने पश्चिम महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. निर्धार यात्रा, पंढरपूर ते बारामती पायी दिंडी, तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलनाचा वेगळा पायंडाच त्यांनी पाडला. चळवळीला नेतृत्व असावे म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवून ती जिंकली. त्यानंतर आमदार आणि आता दुसऱ्यांदा खासदार म्हणून शेतकऱ्यांचा नेता लोकसभेत पोहोचला आहे. ऊस परिषदेच्या माध्यमातून गेली बारा वर्षे शेट्टी यांनी आपला लढा कायम ठेवला आहे. ऊस परिषदेत उसाला पहिली उचल किती मागायची, आंदोलनाची दिशा कोणती ठरवायची, असे अनेक निर्णय या परिषदेत होत असतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून उसाला चांगला दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ओळखले जाते. याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील चळवळीच्या जोरावर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे उल्हास पाटील यांनीही ऊस दरासाठी चांगला लढा दिला होता. खा. शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनीही आंदोलनात भाग घेऊन शेतकऱ्यांचा नेता म्हणून काम केले आहे. नेतृत्वाकडून न्याय मिळाला नसल्यामुळे उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ‘रामराम’ ठोकून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून भगवा फडकविला. संघटित शक्तीची ताकद काय असते, हे पाटील यांनी या निवडणुकीत पटवून दिले आहे. चळवळीतून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता आमदार उल्हास पाटील यांच्या रूपाने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसरा नेता मिळाला आहे. केंद्रात भाजप सरकार आहे, तर राज्यात भाजप-शिवसेना सत्ता येण्याची शक्यता आहे. यामुळे ऊस दरासाठी महायुतीतील खा. राजू शेट्टी लोकसभेत, तर शिवसेनेचे आ. उल्हास पाटील विधानसभेत आवाज उठवितील, अशा अपेक्षा शेतकऱ्यांना लागून राहिल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर अन्य शेतीमालाची उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आहेत. शिवाय तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्नही आवासून उभा आहे. यासाठी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टिकोनातून चालना मिळणे गरजेचे आहे. एकूणच खा. शेट्टींबरोबरच आता आ. पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांचे बळ वाढले आहे. यामुळे भविष्यकाळात शिरोळ तालुक्यातील प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेनेची ऊस परिषद ?उसाला दर मिळावा, यासाठी गेली बारा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषद घेत आहे. हंगामापूर्वी ऊस परिषद, आंदोलन मग कारखाने सुरू, असेच समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’बरोबर आता शिवसेनाही ऊस परिषद घेणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.