शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी कामगार महामंडळामार्फत पुरवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर हे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्यावतीने साखर कारखान्यांना पुरविण्यात यावे, अशी मागणी साखर आयुक्त शेखर ...

जयसिंगपूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर हे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्यावतीने साखर कारखान्यांना पुरविण्यात यावे, अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

ऊस तोडणी मजूर महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी साखर कारखान्यांकडून प्रतिटन दहा रुपयेप्रमाणे गोळा करून किमान १०० कोटी रुपये महामंडळास देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील ९ लाख ऊस तोडणी मजुरांना वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मदत करून त्यांना सक्षम करणे, राज्य सरकार व साखर उद्योगाची नैतिक जबाबदारी आहे. याबाबत दुमत असायचे कारण नाही; मात्र हा प्रश्न सोडवत असताना ऊसतोडणी मजुरांची पळवापळवी व मुकादमाकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक यामुळे साखर कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे. याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. जर राज्यातील सर्व ऊसतोडणी मजुरांची अधिकृतरीत्या नोंदणी करून त्यांना गाळप हंगामापूर्वी दिला जाणारा ॲडव्हॉन्स हा महामंडळामार्फत दिला गेला आणि महामंडळानेच नोंदणीकृत ऊस वाहतूकदारांना साखर कारखान्यांच्या मध्यस्तीने मजुरांचा पुरवठा केला तर मुकादम ही व्यवस्थाच संपून जाईल.

ज्या पद्धतीने असंघटीत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. तशीच मदत ऊस तोडणी कामगारांना होऊ शकते. शिवाय हंगामापूर्वी दिला जाणारा ॲडव्हॉन्स हा साखर कारखान्याकडून त्यांच्या देय मजुरीतून परस्पर कपात करता येईल. ज्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पीक कर्जाची वसुली ९९ टक्के होते. तसेच या ॲडव्हॉन्सचीसुद्धा वसुली होऊ शकते. आतापर्यंत तोडणी मजुरांनी ॲडव्हॉन्स बुडवून पलायन केल्यामुळे राज्यातील किमान २०० हून अधिक वाहतूकदार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ते टाळता येईल व साखर उद्योगाला एक आर्थिक शिस्त लागेल, तरी वरील सुचनेचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी करून ऊस वाहतूक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेट्टी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.