शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

ऊस, भुईमूग, सूर्यफुलांनी माना टाकल्या

By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST

शेती सेवा केंद्रे ओस : खताला मागणीच नाही; पिके कशी जगवायची या चिंतेत बळिराजा -दुष्काळाची दाह

राजाराम लोंढे- कोल्हापूर --डोक्यावर सूर्यनारायण आग ओकत असताना धरणीमातेची ऊबही पेटल्याने आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पोटच्या पोरासारखी जपलेली पिके डोळ्यादेखत करपू लागल्याने बळिराजाचा जीव कासावीस झाला. पाणीच नसल्याने खते व औषधांची फवारणी कोणावर करायची? या विवंचनेत शेतकरी असल्याने एरव्ही खरिपाच्या तयारीसाठी हाऊसफुल्ल असणारी शेती सेवा केंद्रे अक्षरश: ओस पडलेली दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असले तरी उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, कडधान्य व भाताचे क्षेत्रही कमी नाही. जवळपास ११०० हेक्टरमध्ये भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी अधिक असते. ही पिके पाणी खाणारी आहेत, त्यात पाणीटंचाई भासणार, या भीतीने शेतकऱ्यांनी यावर्षी भात, भुईमूग व सूर्यफुलाची पेरणी कमी केली. भातपिकाला तर सतत गारवा लागतो, आता उपसा बंदी असल्याने पाण्याअभावी भात खुरटली आहेत. भुईमूग व सूर्यफुल परिपक्वतेचा काळ असल्याने आता पाण्याची खरी गरज आहे. दहा दिवसांच्या उपसा बंदीनंतर वीज मिळते तेही आठ तास, त्यात उसाला पाणी द्यायचे की इतर पिकांना द्यायचे हेच शेतकऱ्यांना कळेना झाले. डोळ्यादेखत पिके करपू लागल्याने शिवाराकडे जाऊन करायचे तरी काय? अशा मानसिकतेत शेतकरी आहे. आगामी महिना-दीड महिना पिके कशी जगवता येतील. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना खत सोडाच पण इतर फवारणी करण्याचे धाडसही करता येईना. त्याचा परिणाम शेतकरी सेवा केंद्रांवर दिसत आहे. या काळात गजबजलेली केंद्रे अक्षरश: ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (पुर्वार्ध)खतांची मागणी घटली!गतवर्षीच्या तुलनेत मार्च व एप्रिल महिन्यात खत वापरात शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. विविध खतांच्या मागणीत २२ हजार टनांनी घट झाली असून सर्वाधिक वापराच्या युरियाची मागणी तब्बल ४३६० टनांनी कमी झाली आहे.वळीव पाऊस पडला नाहीतर आगामी दीड-दोन महिने शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ राहणार आहे. पाण्याअभावी पाने गुंडाळून जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. जमिनीतील बाष्पीभवन थांबवत असताना पानावाटे होणारे अंतरंगातील बाष्पीभवन थांबविण्यासाठी फवारण्या घ्याव्यात. - डॉ. अशोक पिसाळ, वनस्पती शास्त्रज्ञ