शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस, भुईमूग, सूर्यफुलांनी माना टाकल्या

By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST

शेती सेवा केंद्रे ओस : खताला मागणीच नाही; पिके कशी जगवायची या चिंतेत बळिराजा -दुष्काळाची दाह

राजाराम लोंढे- कोल्हापूर --डोक्यावर सूर्यनारायण आग ओकत असताना धरणीमातेची ऊबही पेटल्याने आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पोटच्या पोरासारखी जपलेली पिके डोळ्यादेखत करपू लागल्याने बळिराजाचा जीव कासावीस झाला. पाणीच नसल्याने खते व औषधांची फवारणी कोणावर करायची? या विवंचनेत शेतकरी असल्याने एरव्ही खरिपाच्या तयारीसाठी हाऊसफुल्ल असणारी शेती सेवा केंद्रे अक्षरश: ओस पडलेली दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असले तरी उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, कडधान्य व भाताचे क्षेत्रही कमी नाही. जवळपास ११०० हेक्टरमध्ये भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी अधिक असते. ही पिके पाणी खाणारी आहेत, त्यात पाणीटंचाई भासणार, या भीतीने शेतकऱ्यांनी यावर्षी भात, भुईमूग व सूर्यफुलाची पेरणी कमी केली. भातपिकाला तर सतत गारवा लागतो, आता उपसा बंदी असल्याने पाण्याअभावी भात खुरटली आहेत. भुईमूग व सूर्यफुल परिपक्वतेचा काळ असल्याने आता पाण्याची खरी गरज आहे. दहा दिवसांच्या उपसा बंदीनंतर वीज मिळते तेही आठ तास, त्यात उसाला पाणी द्यायचे की इतर पिकांना द्यायचे हेच शेतकऱ्यांना कळेना झाले. डोळ्यादेखत पिके करपू लागल्याने शिवाराकडे जाऊन करायचे तरी काय? अशा मानसिकतेत शेतकरी आहे. आगामी महिना-दीड महिना पिके कशी जगवता येतील. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना खत सोडाच पण इतर फवारणी करण्याचे धाडसही करता येईना. त्याचा परिणाम शेतकरी सेवा केंद्रांवर दिसत आहे. या काळात गजबजलेली केंद्रे अक्षरश: ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (पुर्वार्ध)खतांची मागणी घटली!गतवर्षीच्या तुलनेत मार्च व एप्रिल महिन्यात खत वापरात शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. विविध खतांच्या मागणीत २२ हजार टनांनी घट झाली असून सर्वाधिक वापराच्या युरियाची मागणी तब्बल ४३६० टनांनी कमी झाली आहे.वळीव पाऊस पडला नाहीतर आगामी दीड-दोन महिने शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ राहणार आहे. पाण्याअभावी पाने गुंडाळून जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. जमिनीतील बाष्पीभवन थांबवत असताना पानावाटे होणारे अंतरंगातील बाष्पीभवन थांबविण्यासाठी फवारण्या घ्याव्यात. - डॉ. अशोक पिसाळ, वनस्पती शास्त्रज्ञ