शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ऊस, भुईमूग, सूर्यफुलांनी माना टाकल्या

By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST

शेती सेवा केंद्रे ओस : खताला मागणीच नाही; पिके कशी जगवायची या चिंतेत बळिराजा -दुष्काळाची दाह

राजाराम लोंढे- कोल्हापूर --डोक्यावर सूर्यनारायण आग ओकत असताना धरणीमातेची ऊबही पेटल्याने आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पोटच्या पोरासारखी जपलेली पिके डोळ्यादेखत करपू लागल्याने बळिराजाचा जीव कासावीस झाला. पाणीच नसल्याने खते व औषधांची फवारणी कोणावर करायची? या विवंचनेत शेतकरी असल्याने एरव्ही खरिपाच्या तयारीसाठी हाऊसफुल्ल असणारी शेती सेवा केंद्रे अक्षरश: ओस पडलेली दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असले तरी उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, कडधान्य व भाताचे क्षेत्रही कमी नाही. जवळपास ११०० हेक्टरमध्ये भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी अधिक असते. ही पिके पाणी खाणारी आहेत, त्यात पाणीटंचाई भासणार, या भीतीने शेतकऱ्यांनी यावर्षी भात, भुईमूग व सूर्यफुलाची पेरणी कमी केली. भातपिकाला तर सतत गारवा लागतो, आता उपसा बंदी असल्याने पाण्याअभावी भात खुरटली आहेत. भुईमूग व सूर्यफुल परिपक्वतेचा काळ असल्याने आता पाण्याची खरी गरज आहे. दहा दिवसांच्या उपसा बंदीनंतर वीज मिळते तेही आठ तास, त्यात उसाला पाणी द्यायचे की इतर पिकांना द्यायचे हेच शेतकऱ्यांना कळेना झाले. डोळ्यादेखत पिके करपू लागल्याने शिवाराकडे जाऊन करायचे तरी काय? अशा मानसिकतेत शेतकरी आहे. आगामी महिना-दीड महिना पिके कशी जगवता येतील. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना खत सोडाच पण इतर फवारणी करण्याचे धाडसही करता येईना. त्याचा परिणाम शेतकरी सेवा केंद्रांवर दिसत आहे. या काळात गजबजलेली केंद्रे अक्षरश: ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (पुर्वार्ध)खतांची मागणी घटली!गतवर्षीच्या तुलनेत मार्च व एप्रिल महिन्यात खत वापरात शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. विविध खतांच्या मागणीत २२ हजार टनांनी घट झाली असून सर्वाधिक वापराच्या युरियाची मागणी तब्बल ४३६० टनांनी कमी झाली आहे.वळीव पाऊस पडला नाहीतर आगामी दीड-दोन महिने शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ राहणार आहे. पाण्याअभावी पाने गुंडाळून जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. जमिनीतील बाष्पीभवन थांबवत असताना पानावाटे होणारे अंतरंगातील बाष्पीभवन थांबविण्यासाठी फवारण्या घ्याव्यात. - डॉ. अशोक पिसाळ, वनस्पती शास्त्रज्ञ