शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

कारखान्यांकडूनच अजूनही निर्यातीला खो : साखर उठाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:58 IST

केंद्र शासनाने साखर निर्यातीस अनुदान दिले, कारण देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा कोटा कमी व्हावा म्हणून;

ठळक मुद्देस्थिती अशीच राहिल्यास गंभीर परिणाम, अडचणी वाढण्याची साखर संघाकडून भीती

कोल्हापूर : केंद्र शासनाने साखर निर्यातीस अनुदान दिले, कारण देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा कोटा कमी व्हावा म्हणून; परंतु साखर कारखान्यांनीच या निर्णयास खो घातला आहे. हीच स्थिती राहिली तर कारखान्यांना परमेश्वरसुद्धा वाचवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. साखर संघानेही त्याबाबत कारखान्यांना खास पत्रान्वये बजावले आहे.

मागच्या हंगामातील ६ लाख ४८ हजार टन कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला निर्यातीसाठी आला आहे; परंतु त्यातील अजून लाख-दीड लाख टनही निर्यात झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर दोन हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे निर्यातीसाठी दिलेले अनुदान व मिळणारा प्रत्यक्ष दर यांचा विचार केल्यास ही साखर २६०० रुपयांपर्यंत जाते. जेव्हा ही साखर निर्यात होईल, तेव्हाच शिल्लक साखरेला चांगला दर मिळू शकतो. त्यासाठी निर्यात होणे आवश्यक आहे; अन्यथा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सवलती साखर उद्योगास मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने बाजारातील साखरेचे घसरलेले दर सुधारावेत म्हणून साखर विक्रीवर निर्बंध आणले व महिन्याला किती साखरेची विक्री करायची याचा कोटा निश्चित करून दिला. त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला जून महिन्याचा ८ लाख १४ हजार २७३ टन कोटा निश्चित करून दिला. या कोट्यातील किती साखर विक्री झाली याची माहिती राज्य साखर संघाने प्रातिनिधिक स्वरूपात ४९ कारखान्यांकडून मागविली असता त्यामध्ये फक्त चार कारखान्यांनी ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्याचे स्पष्ट झाले.

या चार कारखान्यांचा निर्धारित कोटा १२ हजार ४२९ टन होता. त्यांनी प्रत्यक्षात २१ हजार ४५६ टन साखर विकली. उर्वरित ४५ कारखान्यांचा कोटा २ लाख ६४ हजार ४८६ टन असताना, त्यांनी प्रत्यक्षात ५७ हजार ८५८ टनच विक्री केली आहे. त्यांचा २ लाख ६ हजार ६२८ टन कोटा अजूनही तसाच आहे. महाराष्ट्रातील काही कारखाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार विक्री करीत नसल्याच्या तक्रारी केंद्र शासनाकडे झाल्या आहेत; तर काही कारखाने मात्र त्यांना ठरवून दिलेला कोटा विक्री करून आणखी जादा कोट्याची मागणी करू लागले आहेत. हा विरोधाभास असून केंद्र शासनाने केलेल्या धोरणाशी विसंगत आहे. असे केल्याने केंद्र सरकार निर्यात धोरणांत बदल करू शकते. तसे झाल्यास साखर उद्योगापुढील अडचणी वाढतील, अशी भीती साखर संघाने व्यक्त केली आहे. 

साखर निर्यात होऊन साठे कमी होत नाहीत, तोपर्यंत दरात सुधारणा होणार नाहीत. शिवाय कारखाने सुचविलेल्या उपाययोजना करण्यास प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आल्यास केंद्र शासन दिलेल्या सवलतींचा फेरविचार करू शकते, याचा विचार गांभीर्याने होण्याची गरज आहे.- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर संघ