शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पुरामुळे ४२ हजार हेक्टरमधील ऊस धोक्यात

By admin | Updated: August 9, 2016 00:23 IST

गेले पाच दिवस पाण्याखाली : उत्पादनावर परिणाम होणार असल्याने साखर हंगाम अडचणीत

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या, ओढे-नाल्यांच्या पुराच्या पाण्याखाली सुमारे ४२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गेले आहे. गेले पाच-सहा दिवस उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाणी व चिखल बसल्याने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आधीच दुष्काळात कसरत करत वाढविलेला ऊस पुराच्या पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा फटका आगामी साखर कारखान्यांच्या हंगामाला बसणार आहे. यंदा जिल्ह्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागल्या. धरणात पाणी नसल्याने पाटबंधारे विभागाने सहा महिने कपातीचे धोरण अवलंबले. एप्रिलनंतर तर कपातीचा फास जास्त आवळल्याने उसाची उभी पिके करपली. त्यातून कशी-बशी जगवलेली पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर आला आणि नदीकाठची सर्वच पिके पाण्याखाली गेली. त्यावेळी धरणांतून पाण्याचा विसर्ग नसल्याने पुराचे पाणी दोन-तीन दिवसांतच पात्रात गेले. त्यानंतर गेले आठ दिवस धुवाधार पावसाने नद्यांना पूर आला. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा या नद्यांच्या पात्राशेजारी असणारे ऊस, भात ही पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषत: उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेले असून साधारणत: गुरुवारपासून ऊस पाण्याखाली असल्याने धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीला फूग आहे.गेल्या पाच-सहा दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली ऊस असल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली आहे. जरी उसाचे शेंडे पाण्याच्या वर असतील तर त्या उसाचे २० ते ३० टक्के उत्पादन घटते. शेंडे जर पाण्यात राहिले तर संपूर्ण नुकसान होते. जिल्ह्णात साधारणत: १ लाख ४० हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्र नदीकाठावर असल्याने येथील ऊस धोक्यात आला आहे. अडसाल खोळंबल्या!साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात उसाच्या आडसाल लावणीस सुरुवात होते. त्यामध्ये नदीकाठच्या जमिनीत आडसाल लावणीचे प्रमाण अधिक असते.पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाचा तडाखा असल्याने उसाच्या लावणी खोळंबल्या आहेत, तर ज्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लावणी केल्या आहेत, तिथे सरीत पाणी तुंबल्याने बियाणे कुजले आहे. उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलदगतीने होते. जमिनीत अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होऊन उसाची वाढ खुंटते; यासाठी नत्र, स्फूरद, पालाश यांचा वापर करावा. - डॉ. एस. एम. मोरे, ऊस संशोधन केंद्र या कराव्यात उपाययोजनापूरबुडित क्षेत्रातील साचलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे. उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशावेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत. किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत सरीमध्ये टाकावे. उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी. ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत. एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतांमधून द्यावे. पुराच्या पाण्याला ६७१, ९२००५ कमकुवतजिल्ह्यात जास्त साखर उत्पादन देणारे वाण म्हणून ६७१, ९२००५ व ८६०३२ याचे उत्पादन अधिक आहे; पण यापैकी ६७१ व ९२००५ हे वाण पुराच्या पाण्याला एकदम कमकुवत आहेत. पाणी येणाऱ्या ठिकाणी ७५२७, ८०८४ हे वाण पुराच्या पाण्याला फारशी दाद देत नाहीत. त्यामुळे या वाणाच्या लावणीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे.