शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यातील ऊस पाण्याअभावी वाळू लागला !

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

अपुरा पाणीपुरवठा : खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा संस्थांचे नियोजन ढासळले

शिवराज लोंढे - सावरवाडी सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा संस्थेचे पाणी वाटप नियोजन कोसळले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, उन्हाळ्यामुळे वाढीव वीज भारनियमन, नद्यांच्या पात्रात पाणी असूनही शेतीला योग्यवेळी पाणी मिळत नाही, पाण्याअभावी पिकांचे नुकसान, या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात हजारो एकर क्षेत्रातील ऊस वाळू लागला आहे.करवीर तालुक्यात कुंभी, तुळशी, भोगावती, पंचगंगा या नद्या वाहतात. नदीची पात्रे पाण्याने तुडुंब भरलेली असतानाही सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनांद्वारे उन्हाळ्यात शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असतो. पाणी वाटपात गटा-तटाचे राजकारण सुरू झाले आहे. शेतीला उन्हाळ्यात २० ते २२ दिवसांनी पाणी मिळते. परिणामी, खोडवा, बोडवा, आडसाली ऊस पिकांची क्षेत्रे पाण्याअभावी वाळू लागली आहेत.पिकांना पाणी देण्यात वशिलेबाजी सुरू झाल्याने ऊस पिके वाळू लागली तरी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाचा पाणीपुरवठा संस्थांवर वचक नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी वाटपाचे नियोजन ढासळले आहे. उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वाढीव वीज भारनियमनाचा फटकाही शेती व्यवसायाला बसू लागला आहे. भात पिकातील ऊस लावणी, आडसाली ऊस लावणी, खोडवा, बोडवा या पिकांना यंदा वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे ऊसपिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात ऊसपिके करपू लागल्याने ऊसटंचाई भासणार आहे.एकीकडे पाणीपुरवठा संस्थेच्या पाणीपट्टीमध्ये भरमसाट वाढ, तर दुसरीकडे शेतीला वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे ऊसवाढीवर गंभीर परिणाम होतात. शेतीला भरपूर पाणी देणे हे पाणीपुरवठा संस्थांचे कर्तव्य आहे. पाणी वाटपात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत आवाज उठविण्यात येईल. - दादा देसाई, उपाध्यक्ष, भाजप करवीर तालुका.पाणीपुरवठा संस्थेवर शासनाने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. कारभाराची चौकशी होणे काळाची गरज आहे. शेती वीजभार नियमनमुक्त करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा.- नामदेव गोदडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.पाणीपट्टी दरात विसंगतीसहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपुरवठा संस्था पाणीपट्टी वसुली करून घेतात. साखर कारखान्यांना जादा भरणा कळवून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून जादा आगावू रक्कम कपात केली जाते. त्याचा हिशेबही शेतकऱ्यांना दिला जात नाही. पाणीपट्टी दरात यामुळे विसंगती आढळत आहे.