शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

जुजबी पगारवाढ : मागील वर्षाच्या मागण्यांबाबत चर्चाही नाही; कराराच्या वेतनवाढीलाही विलंब

प्रकाश पाटील -- कोपार्डे --राज्यभरातील दीड लाख साखर कामगारांना सरसकट ९०० रुपये पगार वाढ करण्याचे जाहीर करून शासन व कारखानदारांनी कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ अंतरिम जुजबी पगारवाढीची घोषणा करीत इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करून साखर कामगारांची फसवणूक केल्याच्या तीव्र भावना साखर कामगारांतून उमटत आहेत.दरम्यान, या तुटपुंज्या पगारवाढीच्या घोषनेमुळेच कामगारांनी आज, शनिवारी होणारा संप मागे घेतला आहे. त्यातून सर्वच साखर कारखानदारांचा हेतू साध्य झाला आहे.साखर कामगारांसाठी वेतन करण्याबाबत त्रिपक्षीय वेतन करार समिती अस्तित्वात आली व दर तीन वर्षांनी होणाऱ्या वेतनवाढीचा करार यामुळे पाच वर्षांनी होऊ लागला. या त्रिपक्षीय वेतनवाढीच्या पद्धतीने साखर कामगारांना मिळणारी वेतनवाढ दोन वर्षे उशिरा मिळू लागलीच, त्याशिवाय हा करार संपल्यानंतर तो नव्याने वेळेवर करण्याची कारखानदारांची मानसिकता नसल्याने पुन्हा दीड ते दोन वर्षे या कराराला विलंब होऊ लागला. साखर कामगारांचा मागील वेतन कराराची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. ४० टक्के वेतनवाढीबरोबर बेकार भत्ता, रात्रपाळी भत्ता, यांसह २५ मागण्यांचा प्रस्ताव कामगार प्रतिनिधी मंडळाने शासनापुढे ठेवला होता. मात्र, गेली दीड वर्षे या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वेळकाढूपणाचे धोरण शासन व कारखानदारांनी सुरू केले होते. अखेर दोन जानेवारीला साखर कामगार प्रतिनिधी मंडळांकडून संपाची घोषणा करताच शासन व साखर कारखानदारांना जाग आली. त्या नंतरच्या बैठकीत साखर उद्योगापुढे आर्थिक संकटाची मालिकाच सुुरू असल्याचा पाढा कारखानदारांनी वाचला. याला साखर कामगार संघटनाही बळी पडल्या आणि तब्बल दीड वर्षानंतर ९०० रुपये जुजबी वाढ स्वीकारत या महागाईच्या काळात कामगारांच्या तोंडाला पाने पुसली. साखर उद्योग हा पूर्णत: हंगामी आहे. केवळ हंगामापुरते चार महिनेच ६० टक्के कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. बाकी आठ महिने बेरोजगार राहावे लागते आहे. साखर कामगारांच्या घामावर सात हजार कोटींचे उत्पन्न कराच्या रूपाने शासनाला मिळते. या घटकाबाबत शासनाकडून अनास्था दाखविली जात आहे. म्हणून साखर कामगारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. साखर उद्योगापुढे असलेल्या सध्याच्या अडचणी सोमवारच्या बैठकीत कारखानदारांनी मांडल्या, हे पाहून दोन पावले मागे येण्याच्या निर्णय झाला. आता पाच वर्षांऐवजी तीन वर्षांच्या कराराचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. - राऊसो पाटील, राज्य साखर कामगार संघटना, कार्याध्यक्ष साखर कामगार संघटना कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्याने गेल्या पाच वर्षांत कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिकुशल कामगारांना केवळ १२ ते २५ हजार पगार म्हणजे टिंगलच म्हणावी लागेल. इतर क्षेत्रांपेक्षा साखर कामगारांना मिळणारी वेतनवाढ अत्यंत तटपुंजी आहे. सध्या साखर कामगार संघटनेला सक्षम नेतृत्व नाही, याचा हा परिणाम आहे.- आर. जी. नाळे, साखर कामगारकामगार संघटना कारखानदारांच्या दावणीलाएप्रील २०१४ मध्ये वेतनकरार संपला तरी साखर कामगार प्रतिनिधी मंडळाकडून कोणतीच हालचाल केली गेली नाही. दीड वर्षांनी कामगार नेत्यांनी घोषणा केली; पण चर्चा सुरू झाल्यानंतर युद्धात जिंकले आणि तहात हारले, असेच चित्र पाहायला मिळाले. वेतनवाढी व्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्यावर ठाम चर्चा करण्यात आली नाही. त्याशिवाय गेल्या दीड वर्षातील वेतनवाढीच्या फरकाबाबत काय? याबाबतही ठोस आश्वासन घेता येत नाही.पगारातील तफावत अशीही१९६५ च्या काळात साखर कामगाराला ७० रुपये, तर प्राथमिक शिक्षकांना ४० रुपये पगार होता. मात्र, आज नेमकी उलटी परिस्थिती आहे. शिक्षकाला ४० ते ४५ हजार पगार आहे. तर कुशल साखर कामगाराला १५ ते १८ हजार रुपयापर्यंतच पगार आहे.