शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

साखर कामगार होणार आक्रमक?

By admin | Updated: October 27, 2014 23:46 IST

संघर्षाची चिन्हे : मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर धुराडी पेटू न देण्याचा इशारा

प्रकाश पाटील - कोपार्डे -२०१४-१५ चा हंगाम तोंडावर असताना साखर कामगार संघटना आक्रमक झाली असून, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार संघटनेने दिला आहे. मात्र, यावर्षी साखर कामगार संघटनांच्या बाजूने असणारे पक्ष सत्तेतून बाजूला फेकले गेल्याने कारखानदार व कामगार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.राज्यातील साखर कारखानदारी क्षेत्रात काम करणाऱ्या साखर कामगारांच्या वेतनमंडळ पुनर्रचनेची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले तरी साखर कामगारांच्या मागण्यांकडे मागील शासनाने ठेंगा दाखविला. आपल्या मागण्यांबाबत जागृती करण्यासाठी राज्य साखर कामगार संघटनेने फेब्रुवारी २०१४मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाअधिवेशन भरविले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताच ठोस निर्णय जाहीर केला नसल्याने तत्कालीन सरकारबद्दल मोठा अंसतोष पसरला होता. यानंतर आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून राज्य कामगार संघटनेने पुणे येथे साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी साखर आयुक्तांनी आपण आपल्या मागण्या शासकीय पातळीवर पोहोचवितो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर उद्योगाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे येथे साखर संघ, साखर आयुक्त व कामगार संघटना यांची बैठक घेऊन वेतन कराराच्या बाबतीत त्रिपक्षीय वेतन मंडळ समिती स्थापन करण्याची घोषणा केली. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती नेमण्यात आली असली. या समितीला शासकीय पातळीवर मूर्त स्वरूप आलेले नाही की, वेतन कराराबाबत या समितीची बैठकही झालेली नाही. सध्या साखर कामगारांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करणारे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेतून बाहेर गेल्याने कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी दिलेली आर्त हाक शासनापर्यंत पोहोचणार काय? असा प्रश्न पडल्याने कामगार संघटना आक्रमक झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.साखर कामगारांच्या प्रमुख मागण्याएकूण पगारावर ४० टक्के वेतनवाढबेकार काळातील भत्ता मिळावारात्रपाळी भत्त्यात वाढ मिळावीचार वर्षाला एक अशी एकूण नोकरी कालावधीमध्ये पगारवाढ मिळावीसध्या जिल्ह्यावर साखर कामगारांच्या संघटनांच्या बैठका घेऊन आपल्या मागण्यांबाबत जागृती सुरू आहे. उद्या, २८ आॅक्टोबरला पुणे येथे धोरण समितीची बैठक होणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही.- राऊसो पाटील, उपाध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.