शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

साखर कामगार होणार आक्रमक?

By admin | Updated: October 27, 2014 23:46 IST

संघर्षाची चिन्हे : मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर धुराडी पेटू न देण्याचा इशारा

प्रकाश पाटील - कोपार्डे -२०१४-१५ चा हंगाम तोंडावर असताना साखर कामगार संघटना आक्रमक झाली असून, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार संघटनेने दिला आहे. मात्र, यावर्षी साखर कामगार संघटनांच्या बाजूने असणारे पक्ष सत्तेतून बाजूला फेकले गेल्याने कारखानदार व कामगार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.राज्यातील साखर कारखानदारी क्षेत्रात काम करणाऱ्या साखर कामगारांच्या वेतनमंडळ पुनर्रचनेची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले तरी साखर कामगारांच्या मागण्यांकडे मागील शासनाने ठेंगा दाखविला. आपल्या मागण्यांबाबत जागृती करण्यासाठी राज्य साखर कामगार संघटनेने फेब्रुवारी २०१४मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाअधिवेशन भरविले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताच ठोस निर्णय जाहीर केला नसल्याने तत्कालीन सरकारबद्दल मोठा अंसतोष पसरला होता. यानंतर आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून राज्य कामगार संघटनेने पुणे येथे साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी साखर आयुक्तांनी आपण आपल्या मागण्या शासकीय पातळीवर पोहोचवितो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर उद्योगाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे येथे साखर संघ, साखर आयुक्त व कामगार संघटना यांची बैठक घेऊन वेतन कराराच्या बाबतीत त्रिपक्षीय वेतन मंडळ समिती स्थापन करण्याची घोषणा केली. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती नेमण्यात आली असली. या समितीला शासकीय पातळीवर मूर्त स्वरूप आलेले नाही की, वेतन कराराबाबत या समितीची बैठकही झालेली नाही. सध्या साखर कामगारांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करणारे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेतून बाहेर गेल्याने कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी दिलेली आर्त हाक शासनापर्यंत पोहोचणार काय? असा प्रश्न पडल्याने कामगार संघटना आक्रमक झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.साखर कामगारांच्या प्रमुख मागण्याएकूण पगारावर ४० टक्के वेतनवाढबेकार काळातील भत्ता मिळावारात्रपाळी भत्त्यात वाढ मिळावीचार वर्षाला एक अशी एकूण नोकरी कालावधीमध्ये पगारवाढ मिळावीसध्या जिल्ह्यावर साखर कामगारांच्या संघटनांच्या बैठका घेऊन आपल्या मागण्यांबाबत जागृती सुरू आहे. उद्या, २८ आॅक्टोबरला पुणे येथे धोरण समितीची बैठक होणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही.- राऊसो पाटील, उपाध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.