शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगार होणार आक्रमक?

By admin | Updated: October 27, 2014 23:46 IST

संघर्षाची चिन्हे : मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर धुराडी पेटू न देण्याचा इशारा

प्रकाश पाटील - कोपार्डे -२०१४-१५ चा हंगाम तोंडावर असताना साखर कामगार संघटना आक्रमक झाली असून, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार संघटनेने दिला आहे. मात्र, यावर्षी साखर कामगार संघटनांच्या बाजूने असणारे पक्ष सत्तेतून बाजूला फेकले गेल्याने कारखानदार व कामगार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.राज्यातील साखर कारखानदारी क्षेत्रात काम करणाऱ्या साखर कामगारांच्या वेतनमंडळ पुनर्रचनेची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले तरी साखर कामगारांच्या मागण्यांकडे मागील शासनाने ठेंगा दाखविला. आपल्या मागण्यांबाबत जागृती करण्यासाठी राज्य साखर कामगार संघटनेने फेब्रुवारी २०१४मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाअधिवेशन भरविले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताच ठोस निर्णय जाहीर केला नसल्याने तत्कालीन सरकारबद्दल मोठा अंसतोष पसरला होता. यानंतर आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून राज्य कामगार संघटनेने पुणे येथे साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी साखर आयुक्तांनी आपण आपल्या मागण्या शासकीय पातळीवर पोहोचवितो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर उद्योगाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे येथे साखर संघ, साखर आयुक्त व कामगार संघटना यांची बैठक घेऊन वेतन कराराच्या बाबतीत त्रिपक्षीय वेतन मंडळ समिती स्थापन करण्याची घोषणा केली. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समिती नेमण्यात आली असली. या समितीला शासकीय पातळीवर मूर्त स्वरूप आलेले नाही की, वेतन कराराबाबत या समितीची बैठकही झालेली नाही. सध्या साखर कामगारांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करणारे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेतून बाहेर गेल्याने कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी दिलेली आर्त हाक शासनापर्यंत पोहोचणार काय? असा प्रश्न पडल्याने कामगार संघटना आक्रमक झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.साखर कामगारांच्या प्रमुख मागण्याएकूण पगारावर ४० टक्के वेतनवाढबेकार काळातील भत्ता मिळावारात्रपाळी भत्त्यात वाढ मिळावीचार वर्षाला एक अशी एकूण नोकरी कालावधीमध्ये पगारवाढ मिळावीसध्या जिल्ह्यावर साखर कामगारांच्या संघटनांच्या बैठका घेऊन आपल्या मागण्यांबाबत जागृती सुरू आहे. उद्या, २८ आॅक्टोबरला पुणे येथे धोरण समितीची बैठक होणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर साखर कारखान्यांची चाके फिरू देणार नाही.- राऊसो पाटील, उपाध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.