शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांच्या ‘वेतन करारा’ला ठेंगा

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST

शासनाचे दुर्लक्ष : संघटनेची कचखाऊ भूमिका, मुदत संपून वर्ष उलटले

प्रकाश पाटील- कोपार्डे -ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेला व सहकाराचा आत्मा असणाऱ्या साखर उद्योगातील एक मुख्य घटक साखर कामगार शासनाच्या उदासिनतेने व कारखानदारांच्या दुर्लक्षाने वेठबिगारासारखे वेतन मिळत असल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. याला साखर कामगारांच्या राज्य संघटनेच्या कचखाऊ धोरणामुळे बळ मिळत असल्याची प्रतिक्रिया साखर कामगारांतून व्यक्त होत आहे.१९६० नंतर महाराष्ट्रात सहकारी साखर उद्योगाची मोठी प्रगती सुरू झाली. १९८० ते १९९० हा काळ साखर उद्योगातील सुवर्ण काळ म्हणून संबोधला जातो. यावेळी सहकारातील सहकार महर्षि कार्यरत होते. सहकारातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास हे ध्येय ठेवताना या उद्योगात असणाऱ्या रोजगाराच्या संधी निर्माण करून ग्रामीण भागातील बेरोजगारीही कमी करण्याचा प्रयत्न केला. यात काम करणाऱ्या साखर कामगारांनी आपल्या श्रमाने व तांत्रिक कार्यक्षमतेने हा उद्योगाला सुवर्णकाळ निर्माण करण्यात मोलाचे सहकार्य केले. या कामगारांचे हक्क व अधिकाराचे संरक्षण जपण्यासाठी कामगार संघटनांही निर्माण झाल्या. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या सहकाराच्या ब्रीदवाक्याप्रमाणे चालल्याने या उद्योगाला मोठी भरभराटही आली.मात्र अलिकडे सहकारी साखर कारखानदारीत स्वार्थी राजकारण्यांच्या प्रवेशाने उतरती कळा लागली असून आपला स्वार्थ साधण्यासाठी कारखानदार साम दाम दंड तत्त्वाचा वापर करून साखर कामगारांच्या हक्कांवर व अधिकारांवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. साखर कामगार संघटनाही कारखानदारीच्या दावणीला बांधल्या गेल्याने याबाबत साखर कामगारांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.एप्रिल २०१४ ला वेतन कराराची मुदत संपली असून नवीन वेतन कराराबाबत एक वर्षाचा काळ लोटला असताना शासन ना कामगार संघटना सकारात्मक होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हंगाम २०१४-१५ च्या सुरूवातीला वेतन कराराबरोबर अन्य मागण्यांसाठी साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने त्या मान्य झाल्या नाही तर साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही असा इशराही दिला होता. मात्र हा इशाराही पोकळ गर्जना ठरली असून हंगाम २०१४-१५ लवकरच संपणार असून ना शासन पातळीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत ना संघटनेने त्याबाबत तोंड उघडले आहे.वाढत्या महागाईचा निर्देशांक पाहिल्यास साखर कामगारांना वेठबिगारी प्रमाणे वेतन मिळत असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञांकडून मत व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांच्या तोंडात आपल्या कौश्ल्याने गोडवा निर्माण करणाऱ्या साखर कामगारांना मात्र वेतनातील अल्प लाभाने कडवटपणा निर्माण झाला आहे.हंगामी नोकरीसाखर उद्योगातील कामगाराला हा उद्योग हंगामी चालत असल्याने चार ते सहा महिनेच रोजगार मिळत असतो. बाकीचा सहा ते आठ महिने बेरोजगारी म्हणून रहावे लागते. याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. बिगर हंगामात रोजगार नसल्याने रिटेन्शन अलौन्स काही कारखाने देतात, पण बहुतांश कारखानदार ते देतच नाहीत.१९७० ला साखर कामगाराला ७५ रुपये मासिक पगार होता. शिक्षकाला यावेळी ६० रुपये पगार होता. सध्या मात्र याबाबत उलटा प्रकार असून अत्यंत चांगले तांत्रिक कौश्ल्य असणाऱ्या उत्पादक काम करणाऱ्या साखर कामगाराला १२ ते १५ हजार पगार आहे तर शिक्षकाला ४० ते ४५ हजार आहे.तज्ज्ञ इंजिनिअर केमिस्टला साखर उद्योगात १५ ते १८ हजार पगार आहे. इतर अस्थापनेत काम करणाऱ्या याच तांत्रिक कौशल्य असणाऱ्या व्यक्तीला किमान ५० ते ७० हजाराचे मासिक पॅकेज मिळते. यावरून साखर कामगारांची ससेहोलपट पहायला मिळत आहे.