शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन ३० लाख टनांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:17 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. उभी पिके करपू लागल्याने उत्पादन घटणार असून, पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादनावर होणार आहे. गत हंगामाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये राज्याचे साखर उत्पादन किमान ३० लाख टनांनी घटेल, असा अंदाज आहे. त्या तुलनेत देशाच्या उत्पादनावर परिणाम कमी दिसत असला, तरी ९ टक्के उत्पादन घटेल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे.गेल्या दोन वर्षांपासून महाराष्टÑासह देशात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्टÑाचा वाटा सर्वाधिक असून, त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये तर उसाचे बंपर पीक होऊन ९५१ लाख टन उसाचे गाळप होऊन १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामातील शिल्लक साखर आणि या हंगामातील साखर उत्पादनामुळे कारखान्यांना अग्निदिव्यातूनच पुढे जावे लागले. त्यात वाढलेली एफआरपीची रक्कम आणि साखरेच्या मागणीत झालेल्या घटीमुळे साखर ठेवण्यासाठी कारखान्यांना गोडावून कमी पडू लागली आहेत. साखर पडून राहिल्याने त्यावरील बॅँकेच्या कर्ज व्याजाचा बोझा वाढत चालल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. मागील हंगामाएवढीच यंदाही उसाची लागवड झाल्याने आगामी हंगामातही तेवढेच साखर उत्पादन झाले, तर साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडणार हे निश्चित आहे; पण यंदा सारा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे. पिण्यासह जनावरांनाही पाणी नाही, तिथे पिकांचा विषयच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील सातारा, सोलापूर, सांगलीतील काही तालुके, खानदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांत दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसल्या आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर या विभागातच मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील काही तालुके वगळता उर्वरित ठिकाणी दुष्काळाचा चटका ऊस पिकाला बसला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होईल, असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. मागील दोन वर्षांच्या उसाच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होऊन साखर उत्पादन ८५ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. महाराष्टÑाबरोबरच देशाच्या ऊस उत्पादनातही ९ टक्के घट होईल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे. संपलेल्या गळीत हंगामात देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्यात घट होऊन ३०३ लाख टनापर्यंत येईल, असा अंदाज आहे.राज्याचे साखर उत्पादन लाख टनातहंगाम साखरेचेउत्पादन२००८-०९ ४६२००९-१० ७१२०१०-११ ९१२०११-१२ ९०२०१२-१३ ८०२०१३-१४ ७७२०१४-१५ १०५२०१५-१६ ८४२०१६-१७ ४२२०१७-१८ १०७२०१८-१९ १०७२०१९-२० ८५