शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साखर उत्पादन ३० लाख टनांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:17 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. उभी पिके करपू लागल्याने उत्पादन घटणार असून, पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादनावर होणार आहे. गत हंगामाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये राज्याचे साखर उत्पादन किमान ३० लाख टनांनी घटेल, असा अंदाज आहे. त्या तुलनेत देशाच्या उत्पादनावर परिणाम कमी दिसत असला, तरी ९ टक्के उत्पादन घटेल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे.गेल्या दोन वर्षांपासून महाराष्टÑासह देशात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्टÑाचा वाटा सर्वाधिक असून, त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये तर उसाचे बंपर पीक होऊन ९५१ लाख टन उसाचे गाळप होऊन १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामातील शिल्लक साखर आणि या हंगामातील साखर उत्पादनामुळे कारखान्यांना अग्निदिव्यातूनच पुढे जावे लागले. त्यात वाढलेली एफआरपीची रक्कम आणि साखरेच्या मागणीत झालेल्या घटीमुळे साखर ठेवण्यासाठी कारखान्यांना गोडावून कमी पडू लागली आहेत. साखर पडून राहिल्याने त्यावरील बॅँकेच्या कर्ज व्याजाचा बोझा वाढत चालल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. मागील हंगामाएवढीच यंदाही उसाची लागवड झाल्याने आगामी हंगामातही तेवढेच साखर उत्पादन झाले, तर साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडणार हे निश्चित आहे; पण यंदा सारा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे. पिण्यासह जनावरांनाही पाणी नाही, तिथे पिकांचा विषयच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील सातारा, सोलापूर, सांगलीतील काही तालुके, खानदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांत दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसल्या आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर या विभागातच मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील काही तालुके वगळता उर्वरित ठिकाणी दुष्काळाचा चटका ऊस पिकाला बसला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होईल, असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. मागील दोन वर्षांच्या उसाच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होऊन साखर उत्पादन ८५ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. महाराष्टÑाबरोबरच देशाच्या ऊस उत्पादनातही ९ टक्के घट होईल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे. संपलेल्या गळीत हंगामात देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्यात घट होऊन ३०३ लाख टनापर्यंत येईल, असा अंदाज आहे.राज्याचे साखर उत्पादन लाख टनातहंगाम साखरेचेउत्पादन२००८-०९ ४६२००९-१० ७१२०१०-११ ९१२०११-१२ ९०२०१२-१३ ८०२०१३-१४ ७७२०१४-१५ १०५२०१५-१६ ८४२०१६-१७ ४२२०१७-१८ १०७२०१८-१९ १०७२०१९-२० ८५