शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

साखरेचे उत्पादन २८९ लाख टनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:08 IST

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशभरात गळीत हंगाम गती घेत असतानाच या हंगामातील साखर उत्पादनाचे अंदाज मात्र ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभरात गळीत हंगाम गती घेत असतानाच या हंगामातील साखर उत्पादनाचे अंदाज मात्र बदलत आहेत. नव्या अंदाजानुसार २०१८-१९ च्या साखर हंगामात २८९ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हा अंदाज ३५५ लाख टनांचा होता. दुष्काळी परिस्थिती आणि ऊसावरील हुमणी किडीचा प्रादुर्भाव ही यामागची मुख्य कारणे आहेत.गेल्या हंगामात तब्बल ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागणीपेक्षा ते सुमारे ६० टनांनी जादा होते. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर ३५०० रुपयांवरून २५०० रपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, साखर उद्योगच अडचणीत आला. हे दर वाढावेत यासाठी सरकारने साखरेचा किमान विक्रीदर २९ रुपये निश्चित करून दिला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासहविविध उपाययोजना केल्या तरी साखरेचे देशांतर्गत घाऊक बाजारातील दर जीएसटी वगळता ३००० रुपयांच्या आतबाहेरच घुटमळत राहिले आहेत.ऊस लागवडीखालील क्षेत्रात झालेली वाढ आणि चांगले हवामान यामुळे २0१८-१९ च्या हंगामात ३५५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने सुरुवातीला वर्तविला होता. मात्र, नंतर परिस्थिती बदलली. देशाच्या काही भागात पावसाने दडी मारली. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्याचप्रमाणे उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी, ‘इस्मा’नेच गेल्या महिन्यात आपला अंदाज ३२० लाख टनांवर आणला आहे.तरीही साखर अतिरिक्तचया हंगामाच्या सुरुवातीला सुमारे १०७ लाख टन साखर शिल्लक आहे. ती आणि नव्या हंगामातील २८९ लाख टन अशी ३९६ लाख टन साखर देशात उपलब्ध होणार आहे. देशाची गरज २६० लाख टनांची आहे. अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने यंदा ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य कारखान्यांना दिले आहे.साखरेचे विक्री दर वाढणार का?असे असले तरी साखर कारखानदारी मात्र अस्वस्थ आहे. साखरेचा उत्पादन खर्च सुमारे ३५०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने सद्य:स्थितीत एफआरपीही एकरकमी देणे अवघड असल्याने सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करावा, अशी या कारखानदारांची मागणी आहे. सरकार तो वाढवून देणार का, की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहे तोच दर कायम ठेवणार, याबाबत उत्सुकता आहे.