शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ

By admin | Updated: August 7, 2015 22:53 IST

घसरणीला ब्रेक : साखर उद्योगात आशादायक वातावरण; केंद्र सरकारकडून बफर स्टॉक करण्याचे संकेत

कोपार्डे : साखर हंगाम २०१४-१५ ला आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासून साखर दरात सुरू झालेली घसरण आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करणार, असे सुतोवाच करताच साखर दराच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत साखर दरात प्रती क्विंटल १५० ते २०० रुपये वाढ झाली असल्याने साखर उद्योगात आशादायक चित्र निर्माण झाले आहे.हंगाम २०१४-१५ च्या सुरुवातीला साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३२०० रुपये होते. हा दर ऊस दर व उत्पादन खर्च यांचा मेळ घालण्या इतपत चांगला होता. मात्र, यानंतर साखरेच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाली. साखर उद्योग नियंत्रणमुक्त केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर साखरेची आवक सुरू झाली. त्यातच ब्राझीलमधील कारखानदारांनी इथेनॉलऐवजी साखर उत्पादनाकडे लक्ष दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दरही घसरल्याने निर्यातही ठप्प झाली.यावर्षी केंद्र व राज्य शासनाने कोणताच धोरणात्मक निर्णय साखर उद्योगाबद्दल घेतला नाही. यामुळे आॅक्टोबर २०१४ मध्ये ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असणारा साखरेचा दर १८५० ते १९१० रुपये प्रतिक्विंटल झाला. याचा परिणाम राज्य बँकेनेही कारखान्यांना प्रतिक्विंटल उचल देण्यास आखडता हात घेतला. आॅक्टोबर २०१४ मध्ये २८५० असणारे साखरेचे मूल्यांकन १९५० वर आल्याने साखर कारखाने कोट्यवधी रुपयांनी शॉर्टमार्जिनमध्ये आले. त्यामुळे देशभरात २१ हजार कोटी रुपये ऊस बिलापोटी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. कोल्हापूर विभागात ३५ कारखान्यांकडे सुमारे ८५० कोटी रुपये ऊस बिलांची थकबाकी आहे.या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील खासगी साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे दर देऊन हंगाम सुरू करताच येणार नाही, अशी भूमिका साखर कारखानदारांची संघटना ‘इस्मा’च्या माध्यमातून केंद्रात मांडली. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही पुढाकर घेऊन साखर उद्योग वाचविण्यासाठी केंद्राकडे पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. याचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या साखर कारखानदारांतील तज्ज्ञांच्याबरोबर नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक घेऊन साखर उद्योगाच्या अडचणी जाणून घेतल्या. (वार्ताहर)हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेच्या दरातील घसरणीचा आलेख (प्रतिक्विंटल रुपयात)आॅक्टोबर २०१४३१०० ते ३२००नोव्हेंबर २०१४२८०० ते २९००डिसेंबर २०१४२८०० ते २८५०जानेवारी २०१५२७५०फेब्रुवारी २०१५२६५०मार्च २०१५२५००एप्रिल २०१५२४००मे २०१५२३००जून २०१५२२५०जुलै २०१५२१००आॅगस्ट २०१५१९०५