शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

साखरेच्या माळांनी पाडव्याची चाहूल

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

आठवडा बाजार : मैद्याची मोठी आवक; उन्हाळ्यामुळे लिंबू, काकडीला मागणी वाढली

कोल्हापूर : गुढीपाडवा या सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील बाजारात साखरेच्या माळा दाखल झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने लिंबू, काकडीच्या ग्राहकांकडून मागणीत वाढ झाली आहे. एका लिंबूचा दर पाच रुपयांवर गेला आहे. एकंदरीत, बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल सुरू होती.गुढीपाडवा अवघा पाच दिवसांवर आला आहे. या सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा, मैदा, फुले यांची मागणी वाढू लागली आहे. रविवारी शहरातील बाजारात विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांकडून साखरेच्या माळांची मागणी होत होती. पिवळ्या, भगव्या, पांढऱ्या, गुलाबी अशा चार विविध रंगांत असलेल्या या एका माळेचा दर दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत होता. त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा, गाजरांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये, तर गाजर ४० रुपये झाले आहे. उन्हाळ्यामुळे लिंबू व काकडीला मागणी वाढूनही दरात वाढ झाली आहे. गत आठवड्यात दहा रुपयांना मिळणारे चार लिंबू आता २० रुपये झाले आहेत. लिंबवाचा दर सरासरी पाच रुपये झाला आहे. काकडीचा प्रतिकिलो ६० रुपये झाला आहे. तब्बल २० रुपयांची वाढ झाली आहे. पन्हे, लोणचे, गुळांब्यासाठी असलेली कच्ची कैरी (एक नग) दहा रुपये होती. गुढीपाडव्याला पोळ्याला लागणाऱ्या मैद्याला मागणी आहे. दरम्यान, गहू, डाळ, साखर, तांदूळ, ड्रायफु्रट, तेलाचे दर ‘जैसे थे’ आहेत.दुसरीकडे, मोसंबी, संत्री, सफरचंद (इंडियन, फॉरिन व डेलिसन) आंबा हापूसच्या दरात वाढ झाली आहे. आंबा हापूस पेटीचा दर ३२०० रुपये झाला आहे. तो गत आठवड्यात १८०० रुपये होता. यामध्ये तब्बल १४०० रुपये वाढ झाली. तसेच गूळरव्यामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. शंभर किलोंचा दर ३५५० वरून ३६०० रुपये झाला आहे.यात झाली घसरण...कांदा, बटाटा, वांगी, उसावरील शेंग, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी यामध्ये घसरण झाली आहे. बटाटा ३५ रुपयांवरून २० रुपये प्रतिकिलो, वांगी ३० वरून २० रुपये, उसावरील शेंग ४० वरून २० रुपये आहे. कोथिंबीर, मेथी व पोकळा पाच रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. गुढीपाडव्याला पाच दिवस राहिले असले तरी आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागात साखरेच्या माळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या घाऊक बाजारात साखरेच्या माळा ११० रुपये किलो आहेत.-शिरीष सासने, विक्रेता, लक्ष्मीपुरी बाजार.