शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

साखर सहसंचालकांना हाकलल

By admin | Updated: January 31, 2015 00:01 IST

सेना आक्रमक : ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देण्याची मागणी; टेबल, टेलिफोनची आदळआपटे

कोल्हापूर : साखर कारखान्यांचे हंगाम संपत आले, तरी गाळप झालेल्या  ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहात काय ? अशी विचारणा करीत, ‘केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष फौजदारी दाखल करा; अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही,’ असा इशारा देत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना खुर्चीवरून अक्षरश: हाकलून लावले. ‘एफआरपी’प्रमाणे कारवाई न करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करावी, या मागणीसाठी आज, शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. उसाचे पैसे मिळाले नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहता का ? असा संतप्त सवाल संजय पवार यांनी केला. आयुक्तांच्या नोटिसांचे काही सांगू नका. तुम्ही पोस्टमनचे काम करणार असाल, तर तुमच्यासह या खुर्चीची कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना गरज नसल्याचे संजय पवार, मुरलीधर जाधव व विजय देवणे यांनी सांगितले. ‘वारणा’ कारखान्याने एफ. आर. पी.पेक्षा चारशे रुपये कमी देऊनही कारवाई का केली नाही, अशी विचारणा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली. पहिल्यांदा गुन्हा दाखल करा, मग ‘आरआरसी’ची कारवाई करा, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी केली. आपणाला ते अधिकार नसल्याचे सुर्वे यांनी सांगितल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुम्हाला अधिकार नाहीत तर खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आक्रमक झाले. ‘येथून बाजूला व्हा. जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत खुर्चीवर बसाल तर याद राखा’, असा दमही त्यांनी सुर्वे यांना दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून सुर्वे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी खुर्चीला हात घालण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी टेबल व टेलिफोनची आदळापट सुरू केली. सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, मधुकर पाटील, तानाजी आंग्रे, संभाजी भोकरे, हर्षल सुर्वे, संदीप पाटील उपस्थित होते. सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात : शर्माचौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत म्हणून कारखान्यावर थेट फौजदारी दाखल करता येत नाही. यासाठी संबंधित कारखान्यांची ‘आरआरसी’ अनुसार साखर जप्त करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे देता येतात; पण त्यातून शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी दाखल करता येते. त्याप्रमाणे आढावा घेण्याचे काम सुरू असून, येत्या सोमवारपासून साखरजप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. यांना काढल्या नोटिसापंचगंगा, शरद, डी. वाय. पाटील, महाडिक शुगर्स, वारणा, कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम कारखानागेले दोन महिन्यांत साखर आयुक्तांकडे कारखान्यांवरील कारवाईबाबत तीन प्रस्ताव पाठविले आहेत. संबंधितांकडून कारवाईचे आदेश येत नाहीत तर मी काय करू? शेतकऱ्यांच्या भावना मी समजू शकतो; पण जो अधिकारच मला नाही, तो वापरणार कसा ?- वाय. व्ही. सुर्वे, प्रादेशिक साखर सहसंचालक