शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 26, 2016 00:49 IST

दर प्रतिक्ंिवटल ३४०० रुपये : ‘एफआरपी’ देणे शक्य होणार

चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर -साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत गेल्याने साखर उद्योगाला ‘अच्छे दिन ’ येण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी एका दिवसात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५० ते ६० रुपयांची वाढ होऊन तो ३३५० ते ३४०० रुपये ( एक्स फॅक्टरी दर ३१५० ते ३२०० रुपये) झाला आहे. यामुळे कारखान्यांना उसाची एफआरपी देणे शक्य होणार आहे. बाजाराची कमान अशीच चढती राहिल्यास साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर, त्यामुळे होत असलेली साखरेची निर्यात, दुष्काळामुळे गतवर्षीच्या तुलनेत घटलेले साखर उत्पादन आणि लग्नसराई आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली साखरेची मागणी यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. तसे दरवर्षीच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तेजी येत असते. यंदा थोडे उशिराच दर वाढू लागले आहेत. व्यापाऱ्यांकडील साखरेचा शिल्लक साठा आणि बाजाराचा कल पाहण्याची व्यापाऱ्यांची भूमिका यामुळे ही दरवाढ थोडी उशिरा सुरू झाल्याचे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीमुळे साखर कारखान्यांना चांगला दर मिळत असला तरी त्यामुळे लगेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल किंवा उसाला आणखी चांगला दर देणे शक्य होईल, असे नाही. कारण गेली दोन वर्षे बाजारात उत्पादन खर्चाइतकाही साखरेला दर नसतानाही तोटा सहन करून उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. त्याचा प्रतिटन बोजा साधारणपणे ६०० रुपये इतका आहे. हे कर्ज पाच वर्षांत फेडायचे आहे. यातले पहिले वर्ष गेले असे म्हटले तरी पुढील चार वर्षांत हे कर्ज फेडण्यासाठी प्रतिटन १२५ ते १५० रुपये कारखान्यांना बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत.वायदे बाजारातही साखरेच्या दरात शुक्रवारी ७५ रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यासाठी गुरुवारी एस ३० ग्रेडच्या साखरेचा दर कर वगळता प्रतिक्विंटल ३०७५ ते ३१२५ रुपये असा होता. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यासाठी शुक्रवारी ३१३० ते ३१८० रुपये (यात २०० रुपये कराचे जमा केल्यास हा दर ३३३० ते ३३८० रुपये होतो) प्रतिक्विंटल इतका झाला आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन २८ लाख टनांपर्यंत गेले होते. यंदा ते २५५ ते २६० लाख टनांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. दुष्काळामुळे पुढील वर्षी उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने साखर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होऊ लागली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या दोन वर्षांत बाजारात मागणीपेक्षा साखरेचा पुरवठा जादा होता; मात्र सध्या साखरेची होणारी निर्यात आणि घटलेल्या उत्पादनामुळे मागणी पुरवठ्याचे संतुलन साधले गेल्याने बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. यामुळे कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले भागविता येणे शक्य होणार आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत एफआरपीसाठी घेतलेले बिनव्याजी कर्ज फेडण्याची जबाबदारीही कारखान्यांना पेलावी लागणार आहे .- विजय औताडे, कार्यकारी संचालक, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल.