शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 26, 2016 00:49 IST

दर प्रतिक्ंिवटल ३४०० रुपये : ‘एफआरपी’ देणे शक्य होणार

चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर -साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत गेल्याने साखर उद्योगाला ‘अच्छे दिन ’ येण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी एका दिवसात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५० ते ६० रुपयांची वाढ होऊन तो ३३५० ते ३४०० रुपये ( एक्स फॅक्टरी दर ३१५० ते ३२०० रुपये) झाला आहे. यामुळे कारखान्यांना उसाची एफआरपी देणे शक्य होणार आहे. बाजाराची कमान अशीच चढती राहिल्यास साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर, त्यामुळे होत असलेली साखरेची निर्यात, दुष्काळामुळे गतवर्षीच्या तुलनेत घटलेले साखर उत्पादन आणि लग्नसराई आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली साखरेची मागणी यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. तसे दरवर्षीच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तेजी येत असते. यंदा थोडे उशिराच दर वाढू लागले आहेत. व्यापाऱ्यांकडील साखरेचा शिल्लक साठा आणि बाजाराचा कल पाहण्याची व्यापाऱ्यांची भूमिका यामुळे ही दरवाढ थोडी उशिरा सुरू झाल्याचे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीमुळे साखर कारखान्यांना चांगला दर मिळत असला तरी त्यामुळे लगेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल किंवा उसाला आणखी चांगला दर देणे शक्य होईल, असे नाही. कारण गेली दोन वर्षे बाजारात उत्पादन खर्चाइतकाही साखरेला दर नसतानाही तोटा सहन करून उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. त्याचा प्रतिटन बोजा साधारणपणे ६०० रुपये इतका आहे. हे कर्ज पाच वर्षांत फेडायचे आहे. यातले पहिले वर्ष गेले असे म्हटले तरी पुढील चार वर्षांत हे कर्ज फेडण्यासाठी प्रतिटन १२५ ते १५० रुपये कारखान्यांना बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत.वायदे बाजारातही साखरेच्या दरात शुक्रवारी ७५ रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यासाठी गुरुवारी एस ३० ग्रेडच्या साखरेचा दर कर वगळता प्रतिक्विंटल ३०७५ ते ३१२५ रुपये असा होता. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यासाठी शुक्रवारी ३१३० ते ३१८० रुपये (यात २०० रुपये कराचे जमा केल्यास हा दर ३३३० ते ३३८० रुपये होतो) प्रतिक्विंटल इतका झाला आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन २८ लाख टनांपर्यंत गेले होते. यंदा ते २५५ ते २६० लाख टनांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. दुष्काळामुळे पुढील वर्षी उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने साखर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होऊ लागली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या दोन वर्षांत बाजारात मागणीपेक्षा साखरेचा पुरवठा जादा होता; मात्र सध्या साखरेची होणारी निर्यात आणि घटलेल्या उत्पादनामुळे मागणी पुरवठ्याचे संतुलन साधले गेल्याने बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. यामुळे कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले भागविता येणे शक्य होणार आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत एफआरपीसाठी घेतलेले बिनव्याजी कर्ज फेडण्याची जबाबदारीही कारखान्यांना पेलावी लागणार आहे .- विजय औताडे, कार्यकारी संचालक, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल.