शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:45 IST

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान ...

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याने अद्दल घडविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इचलकरंजी येथे शनिवारी रात्री भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा या विषयावर आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने राजू शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही अशी टीका दोन्ही सरकारमधील भाजप नेते करत आहेत. मात्र, २०० रुपयांची वाढ, अशी फसवी घोषणा केली. सरकारने प्रत्यक्षात २०० रुपयांची वाढ दिल्याचे सांगत असले तरी रिकव्हरीचा ९.५ टक्के असलेला बेस दहा टक्के केला आहे. त्यामुळे शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे.वस्त्रोद्योगासाठी लढा उभारणारशेट्टी म्हणाले, भाजप सरकारने वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनविली आहे. वीज दर कमी केले म्हणून तीनवेळा भाजप नेत्यांनी साखर वाटली. ही साखर वाटून लोकांची साखर वाढली. मात्र, वीज दर कमी झाले नाहीत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, त्याही आजतागायत पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात यंत्रमागधारकांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.चंद्रकांत पाटील यांनीच माझ्याविरुद्ध लढावेराजू शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी माझ्याविरोधात नव्या उमेदवारांची नावे घोषित करीत बसण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.