शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

साखर कारखान्यांच्या कामगारांत आता होणार १५ टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:05 IST

अतिरिक्त कामगार भरतीमुळे साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी गेली सहा वर्षे प्रलंबित असणाऱ्या स्टाफिंग पॅटर्नला गती आली आहे.

कोल्हापूर : अतिरिक्त कामगार भरतीमुळे साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी गेली सहा वर्षे प्रलंबित असणाऱ्या स्टाफिंग पॅटर्नला गती आली आहे. समिती १५ दिवसांत स्टाफिंगबाबतचा अंतिम अहवाल शासनास सादर करणार आहे. यामध्ये कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले आधुनिकीकरण व संगणकीकरण यांचा विचार करता, किमान १५ टक्के कामगार कपात होणार, हे निश्चित आहे.स्थानिक राजकारणामुळे साखर कारखान्यांमध्ये अवास्तव नोकरभरती केली जाते. त्याचा परिणाम व्यवस्थापन खर्चावर होऊन अनेक कारखाने आतबट्ट्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेनुसार किती कामगार असावेत, याबद्दल १९८४ ला पॅटर्न ठरविला होता. त्यानुसारच २००३ पर्यंत भरती प्रक्रिया सुरू होती.यू. व्ही. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली २००३ ला समितीने नवीन स्टाफिंग पॅटर्न बनविला. त्याची अंमलबजावणी सुरू होती. मात्रगेल्या १०-१५ वर्षांत साखर कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. विस्तारीकरणाबरोबरच आधुनिकीकरण व संगणकीकरण झाल्याने मनुष्यबळ कमी लागते. मात्र कामगारांची संख्या वाढतच गेली. नवीन स्टाफिंग पॅटर्नमध्ये किमान १० ते १५ टक्के कामगार कपात होणार, हे निश्चित आहे.पाच हजार गाळपक्षमतेला ७०० कर्मचारीचनवीन पॅटर्ननुसार पाच हजार गाळप क्षमता असणाºया कारखान्यांचा स्टाफिंग पॅटर्न ७०० पेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा राहणार आहे. रोजंदारी कामगार घेण्यास मुभा असली तरी त्यावरही बंधने येणार आहेत.>व्यवस्थापन खर्च प्रतिटन २२५ रुपये गरजेचाबहुतांश कारखान्यांचा व्यवस्थापन खर्च प्रतिटन २२५ ते २५० रुपयांपर्यंत जातो. मात्र नवीन कारखान्यांचा हा खर्च निम्म्यावर आला असून, काही कारखाने प्रतिटन ८० रुपयांनी चालविले जातात. सरासरी २२५ रुपये खर्च अपेक्षित असतो. मात्र अनेक कारखान्यांचा खर्च प्रतिटन ३७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.