शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

साखर कारखान्यांच्या कामगारांत आता होणार १५ टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:05 IST

अतिरिक्त कामगार भरतीमुळे साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी गेली सहा वर्षे प्रलंबित असणाऱ्या स्टाफिंग पॅटर्नला गती आली आहे.

कोल्हापूर : अतिरिक्त कामगार भरतीमुळे साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी गेली सहा वर्षे प्रलंबित असणाऱ्या स्टाफिंग पॅटर्नला गती आली आहे. समिती १५ दिवसांत स्टाफिंगबाबतचा अंतिम अहवाल शासनास सादर करणार आहे. यामध्ये कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले आधुनिकीकरण व संगणकीकरण यांचा विचार करता, किमान १५ टक्के कामगार कपात होणार, हे निश्चित आहे.स्थानिक राजकारणामुळे साखर कारखान्यांमध्ये अवास्तव नोकरभरती केली जाते. त्याचा परिणाम व्यवस्थापन खर्चावर होऊन अनेक कारखाने आतबट्ट्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेनुसार किती कामगार असावेत, याबद्दल १९८४ ला पॅटर्न ठरविला होता. त्यानुसारच २००३ पर्यंत भरती प्रक्रिया सुरू होती.यू. व्ही. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली २००३ ला समितीने नवीन स्टाफिंग पॅटर्न बनविला. त्याची अंमलबजावणी सुरू होती. मात्रगेल्या १०-१५ वर्षांत साखर कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. विस्तारीकरणाबरोबरच आधुनिकीकरण व संगणकीकरण झाल्याने मनुष्यबळ कमी लागते. मात्र कामगारांची संख्या वाढतच गेली. नवीन स्टाफिंग पॅटर्नमध्ये किमान १० ते १५ टक्के कामगार कपात होणार, हे निश्चित आहे.पाच हजार गाळपक्षमतेला ७०० कर्मचारीचनवीन पॅटर्ननुसार पाच हजार गाळप क्षमता असणाºया कारखान्यांचा स्टाफिंग पॅटर्न ७०० पेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा राहणार आहे. रोजंदारी कामगार घेण्यास मुभा असली तरी त्यावरही बंधने येणार आहेत.>व्यवस्थापन खर्च प्रतिटन २२५ रुपये गरजेचाबहुतांश कारखान्यांचा व्यवस्थापन खर्च प्रतिटन २२५ ते २५० रुपयांपर्यंत जातो. मात्र नवीन कारखान्यांचा हा खर्च निम्म्यावर आला असून, काही कारखाने प्रतिटन ८० रुपयांनी चालविले जातात. सरासरी २२५ रुपये खर्च अपेक्षित असतो. मात्र अनेक कारखान्यांचा खर्च प्रतिटन ३७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.