शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

साखर कारखान्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार

By admin | Updated: April 30, 2016 00:46 IST

अनुदान बंद निर्णय : जिल्ह्याला ६७.५० कोटींचा तोटा शक्य

 प्रकाश पाटील-- कोपार्डे साखरेचे दर वाढले म्हणून ४५ रुपये अनुदान बंद करण्याचा केंद्राचा विचार असल्याने कारखान्यांचा दुहेरी तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ मध्ये एफ.आर.पी.ची पूर्ण रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने गाळप उसावर प्रतिटन ४५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर करताना साखर निर्यातीचे बंधन घातले होते. या निर्यात अनुदानासाठी कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपयांनी प्रतिक्विंटल साखर निर्यात केली आहे. आता अनुदान बंद करण्याच्या निर्णयाने साखर कारखान्यांना तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ ची एफ.आर.पी. साखरेचे दर घसरल्याने देता येणे शक्य नाही, अशी भूमिका कारखानदारांची संघटना ‘इस्मा’ने घेतली. हंगाम सुरू करावयाचा असेल तर शासनाने एफ.आर.पी. देण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली. यामुळे हंगाम सुरू करताना पेच निर्माण होणार म्हणून केंद्र शासनाने जे कारखाने हंगाम २०१४/१५ च्या साखर उत्पादनापैकी ११ टक्के साखर निर्यात करतील, त्या कारखान्यांना गाळप झालेल्या प्रतिटन उसातील ४५ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा आॅगस्ट २०१५ मध्ये केली. त्यानंतर जे कारखाने साखर निर्यात करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व अनुदानही दिले जाणार नाही, असे जाहीर केले. यामुळे कारखानदारांनी निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलने साखर निर्यात केली. गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर वाढत आहेत. आज साखरेच्या दराने ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल दर गाठला आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे निर्यात अनुदान बंद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ते बंद केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ६७ कोटी ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या साखरेच्या दरात प्रतिक्विंटल एक हजार ते १२०० रुपयांचा फटका बसणार आहे. कारण केंद्राकडून एफआरपीसाठी मिळणारे प्रतिटन ४५ रुपये कारखानदारांना जवळचे द्यावे लागणार आहेत.