शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

साखर कारखान्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार

By admin | Updated: April 30, 2016 00:46 IST

अनुदान बंद निर्णय : जिल्ह्याला ६७.५० कोटींचा तोटा शक्य

 प्रकाश पाटील-- कोपार्डे साखरेचे दर वाढले म्हणून ४५ रुपये अनुदान बंद करण्याचा केंद्राचा विचार असल्याने कारखान्यांचा दुहेरी तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ मध्ये एफ.आर.पी.ची पूर्ण रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने गाळप उसावर प्रतिटन ४५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर करताना साखर निर्यातीचे बंधन घातले होते. या निर्यात अनुदानासाठी कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपयांनी प्रतिक्विंटल साखर निर्यात केली आहे. आता अनुदान बंद करण्याच्या निर्णयाने साखर कारखान्यांना तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ ची एफ.आर.पी. साखरेचे दर घसरल्याने देता येणे शक्य नाही, अशी भूमिका कारखानदारांची संघटना ‘इस्मा’ने घेतली. हंगाम सुरू करावयाचा असेल तर शासनाने एफ.आर.पी. देण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली. यामुळे हंगाम सुरू करताना पेच निर्माण होणार म्हणून केंद्र शासनाने जे कारखाने हंगाम २०१४/१५ च्या साखर उत्पादनापैकी ११ टक्के साखर निर्यात करतील, त्या कारखान्यांना गाळप झालेल्या प्रतिटन उसातील ४५ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा आॅगस्ट २०१५ मध्ये केली. त्यानंतर जे कारखाने साखर निर्यात करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व अनुदानही दिले जाणार नाही, असे जाहीर केले. यामुळे कारखानदारांनी निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलने साखर निर्यात केली. गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर वाढत आहेत. आज साखरेच्या दराने ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल दर गाठला आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे निर्यात अनुदान बंद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ते बंद केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ६७ कोटी ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या साखरेच्या दरात प्रतिक्विंटल एक हजार ते १२०० रुपयांचा फटका बसणार आहे. कारण केंद्राकडून एफआरपीसाठी मिळणारे प्रतिटन ४५ रुपये कारखानदारांना जवळचे द्यावे लागणार आहेत.