शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

साखर कारखान्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार

By admin | Updated: April 30, 2016 00:46 IST

अनुदान बंद निर्णय : जिल्ह्याला ६७.५० कोटींचा तोटा शक्य

 प्रकाश पाटील-- कोपार्डे साखरेचे दर वाढले म्हणून ४५ रुपये अनुदान बंद करण्याचा केंद्राचा विचार असल्याने कारखान्यांचा दुहेरी तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ मध्ये एफ.आर.पी.ची पूर्ण रक्कम देण्यासाठी केंद्र शासनाने गाळप उसावर प्रतिटन ४५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर करताना साखर निर्यातीचे बंधन घातले होते. या निर्यात अनुदानासाठी कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपयांनी प्रतिक्विंटल साखर निर्यात केली आहे. आता अनुदान बंद करण्याच्या निर्णयाने साखर कारखान्यांना तोटा होणार आहे. हंगाम २०१५/१६ ची एफ.आर.पी. साखरेचे दर घसरल्याने देता येणे शक्य नाही, अशी भूमिका कारखानदारांची संघटना ‘इस्मा’ने घेतली. हंगाम सुरू करावयाचा असेल तर शासनाने एफ.आर.पी. देण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली. यामुळे हंगाम सुरू करताना पेच निर्माण होणार म्हणून केंद्र शासनाने जे कारखाने हंगाम २०१४/१५ च्या साखर उत्पादनापैकी ११ टक्के साखर निर्यात करतील, त्या कारखान्यांना गाळप झालेल्या प्रतिटन उसातील ४५ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा आॅगस्ट २०१५ मध्ये केली. त्यानंतर जे कारखाने साखर निर्यात करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व अनुदानही दिले जाणार नाही, असे जाहीर केले. यामुळे कारखानदारांनी निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलने साखर निर्यात केली. गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर वाढत आहेत. आज साखरेच्या दराने ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल दर गाठला आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे निर्यात अनुदान बंद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ते बंद केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ६७ कोटी ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या साखरेच्या दरात प्रतिक्विंटल एक हजार ते १२०० रुपयांचा फटका बसणार आहे. कारण केंद्राकडून एफआरपीसाठी मिळणारे प्रतिटन ४५ रुपये कारखानदारांना जवळचे द्यावे लागणार आहेत.