शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

साखर कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 8, 2015 00:52 IST

मार्ग मोकळा : ‘दालमिया’, ‘डी. वाय.’, ‘वारणा’, संताजी घोरपडे कारखान्यांचा हंगाम सुरू

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली. ‘दालमिया’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’, ‘वारणा’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांचे गाळप धडाक्यात सुरू झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. एकरकमी ‘एफआरपी’वरून यंदाच्या गळीत हंगामापुढे पेच निर्माण झाला होता. यंदा पाऊस एकदमच कमी झाल्याने पाणीटंचाई भासणार आहे. जानेवारीनंतर उसाला पाणी मिळणार नाही, अशा परिस्थितीत ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ‘दालमिया’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता; पण ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने एकरकमी एफआरपीसाठी हे कारखाने बंद पाडले. राज्यासमोरील पाणीटंचाईचे संकट आणि ऊस उत्पादकांची सुरू असलेली घालमेल ओळखून खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. हंगाम सुरू करण्याची परवानगी देऊन एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एकरकमी एफआरपी दिली, तरच कारखाने सुरू राहतील. अन्यथा, कारखाना बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच कारखानदारांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. यामध्ये शेतकरी संघटनेने आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्याने कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दालमिया-आसुर्ले, डॉ. डी. वाय. पाटील-असळज, वारणा, संताजी घोरपडे- कागल या कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू झाला असून, इतर कारखाने येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तुटपुंजी वाढ : तोडणी मजुरांना मुंडेंची आठवण मराठवाड्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होऊ लागल्या आहेत. तोडणी मजुरीमध्ये केलेल्या तुटपुंज्या वाढीबाबत त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे. गोपीनाथ मुंडे असते, तर आमची अशी हेळसांड झाली नसती, अशा भावना मजुरांमधून व्यक्त होत आहेत.