शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

साखर कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 8, 2015 00:52 IST

मार्ग मोकळा : ‘दालमिया’, ‘डी. वाय.’, ‘वारणा’, संताजी घोरपडे कारखान्यांचा हंगाम सुरू

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली. ‘दालमिया’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’, ‘वारणा’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांचे गाळप धडाक्यात सुरू झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. एकरकमी ‘एफआरपी’वरून यंदाच्या गळीत हंगामापुढे पेच निर्माण झाला होता. यंदा पाऊस एकदमच कमी झाल्याने पाणीटंचाई भासणार आहे. जानेवारीनंतर उसाला पाणी मिळणार नाही, अशा परिस्थितीत ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ‘दालमिया’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता; पण ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने एकरकमी एफआरपीसाठी हे कारखाने बंद पाडले. राज्यासमोरील पाणीटंचाईचे संकट आणि ऊस उत्पादकांची सुरू असलेली घालमेल ओळखून खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. हंगाम सुरू करण्याची परवानगी देऊन एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एकरकमी एफआरपी दिली, तरच कारखाने सुरू राहतील. अन्यथा, कारखाना बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच कारखानदारांच्या नजरा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे लागल्या होत्या. यामध्ये शेतकरी संघटनेने आंदोलनाची दिशा स्पष्ट केल्याने कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दालमिया-आसुर्ले, डॉ. डी. वाय. पाटील-असळज, वारणा, संताजी घोरपडे- कागल या कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू झाला असून, इतर कारखाने येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तुटपुंजी वाढ : तोडणी मजुरांना मुंडेंची आठवण मराठवाड्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होऊ लागल्या आहेत. तोडणी मजुरीमध्ये केलेल्या तुटपुंज्या वाढीबाबत त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे. गोपीनाथ मुंडे असते, तर आमची अशी हेळसांड झाली नसती, अशा भावना मजुरांमधून व्यक्त होत आहेत.