शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

साखर कारखान्यांनी उचलला विजेचा ‘भार’

By admin | Updated: April 25, 2016 00:53 IST

सहवीज प्रकल्प : स्वत:ची गरज भागवून कारखान्यांना हंगामात ४२० कोटी रुपयांचा वीज बोनस

प्रकाश पाटील --कोपार्डे --कोल्हापूर जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी २०१५/१६ या हंगामात ७२ कोटी ८५ लाख युनिट वीज निर्मिती केली असून, स्वत:ची विजेची गरज भागवून महावितरणला ६५ कोटी ५८ लाख युनिट विजेची विक्री केली आहे. सहवीज प्रकल्पातून विक्री होणाऱ्या विजेला प्रति युनिट सहा रुपये ४५ पैशांच्यावरती दर मिळतो. यातून या हंगामात ४१९ कोटी ७१ लाख ३९ हजार रुपयांचा बोनस जिल्ह्यातील कारखान्यांना मिळाला आहे. सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती व विक्रीत ‘दत्त शिरोळ’ने आघाडी घेतली असून, ‘वारणा’ दोन नंबरवर आहे.केंद्र शासनाने विजेचा तुटवडा कमी करण्याबरोबर कोळसा वीज निर्मितीतील प्रदूषण टाळण्यासाठी साखर उद्योगातील ऊस गाळपातून उपलब्ध होणाऱ्या बगॅसपासून वीजनिर्मितीला प्राधान्य दिले. यासाठी सहवीज प्रकल्प राबविणाऱ्या साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याबरोबर निर्माण होणारी वीज सहा रुपये ४५ पैसे प्रतियुनिट खरेदी करण्याची हमीही घेतली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांपैकी १४ साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला. गेली चार वर्षे साखर कारखान्यातील सहवीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा आधार महावितरणलाही झाला असून, यामुळे भारनियमनावर पर्याय मिळाला आहे. मागील हंगामापेक्षा या हंगामात २०१५/१६ मध्ये जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून दहा कोटी युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे. ज्या साखर कारखान्यांचे वीज प्रकल्प आहेत, त्यांना ऊस खरेदीकर माफ असल्याने पाच लाख टन उसाचे गाळप कारणाऱ्या कारखान्यांना पाच कोटी, तर दहा लाख टन गाळप करणाऱ्यांना दहा कोटी ऊस खरेदीकर माफ होणार आहे.