शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साखर निर्यातीस टनास "५०० अनुदान, राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव : सुभाष देशमुख यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:55 IST

कोल्हापूर : साखर उत्पादन जास्त झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कारखानदारीस मदत म्हणून निर्यातीसाठी टनास ५०० रुपये अनुदान देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे.

विश्वास पाटील ।कोल्हापूर : साखर उत्पादन जास्त झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कारखानदारीस मदत म्हणून निर्यातीसाठी टनास ५०० रुपये अनुदान देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महाराष्ट्राच्या वाट्याला ६ लाख २१ हजार टन निर्यातीचा कोटा येत आहे.साखरेचे बंपर उत्पादन झाले असून, देशांतर्गत व देशाबाहेरही तिचा उठाव नाही; त्यामुळे सध्या बाजारात साखरेचा दर २६०० रुपयांपर्यंत कोसळले आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून तब्बल एक हजार रुपयांनी दर घसरले आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर पुढील हंगाम कसा घ्यायचा व शेतकऱ्यांना बिले कशी द्यायची, असा पेच कारखानदारीसमोर आहे. देशात आजघडीला २१० लाख टनांपर्यंत साखर तयार आहे. अजून काही कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. आॅक्टोबरमध्ये सुरू होणााºया नव्या हंगामापर्यंत कशीबशी १२५ लाख टन साखर देशांतर्गत वापरली जाईल त्यामुळे किमान १०० लाख टनाहून अधिक साखर शिल्लक राहते. हे लक्षात घेऊन केंद्राने निर्यातीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २० लाख टन साखर निर्यात करण्यात येणार आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर २१०० रुपयांपर्यंत असल्याने कारखानदार तोटा सहन करून निर्यात करण्यास तयार नाहीत; म्हणून राज्य सरकार अनुदान देण्याचा विचार करीत आहे.देशमुख यांनी यापूर्वी २५ टक्के साखर ३२०० रुपयांप्रमाणे खरेदी करण्याचा शासन विचार करीत आहे, असे जाहीर केले होते; परंतु तसे केल्याने महाराष्ट्रातील साखर महाराष्ट्रातच राहील व त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गरज असल्याने हा प्रस्ताव बारगळल्यात जमा आहे. म्हणूनच निर्यात अनुदान देण्याचा विचार करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले...साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन किमान ५० लाख टन साखर देशाबाहेर जाऊ दिली पाहिजे; तरच साखर उद्योगाला दिलासा मिळू शकेल. आम्ही त्यासाठी पंतप्रधानांनीच तातडीने बैठक बोलवावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. केंद्राने काही निर्णय घेतल्यानंतर आवश्यकता वाटल्यास राज्य सरकार मदत करू शकेल.दिलीप वळसे-पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघ