शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

सांगलीत ३ मे रोजी प्रति साखर परिषद

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

सदाभाऊ खोत : सरकारविरोधी ‘स्वाभिमानी’चा एल्गार

सांगली : शेतकरी हिताची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही शेतकऱ्यांवर गाढवाचा नांगर फिरवणार असाल, तर जनता तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांतील सरकारचा कारभार लक्षात घेता सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला. लढ्याचाच एक भाग म्हणून ३ मे रोजी सांगलीत प्रति साखर परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला विरोध म्हणून शेतकरी संघटना भाजप सरकारच्या बाजूने उभी राहिली होती. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, यासाठी त्यांना सूचना करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली दिसत नाही. एफआरपीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या हातात पडेल, अशी साधी अपेक्षा होती; परंतु सहकारमंत्र्यांच्या वल्गना सोडल्यास दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकारने केवळ लिकर लॉबीचे हित जपण्याचेच कार्य केले आहे. मध्यंतरी पुणे येथे भाजप आणि राष्ट्रवादीने साखर परिषदेचे आयोजन केले होते. ज्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे घातले, त्यांना घेऊनच साखर परिषद घेण्यात आली. सरकारला सामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले होते, मग त्यांना बाजूला सारून कारखानदारांना परिषदेत का बोलाविले हे समजत नाही. अडतबाबत नेमलेली समितीही वाऱ्यावरची वरातच ठरणार असून, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. दूध दराबाबतही फारसे आशादायक चित्र नाही. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठीच तीन मे रोजी सांगलीत राजपूत कार्यालयात दुपारी एक वाजता प्रति साखर परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी) पुुण्यात झालेल्या साखर परिषदेत सहकारमंत्री पाटील यांनी खासदार शरद पवार यांना गुरूची उपमा दिली आहे. हे त्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला सांगितले असते, तर मतदारांनी मत देताना नक्कीच विचार केला असता, असे खोत यांनी सांगितले.पवारांचे ‘रनर’ व्हावेशरद पवार अप्रत्यक्षरीत्या सरकारमध्येच असल्याने भाजप सरकारने त्यांनाच कृषिमंत्री करून सहकारमंत्री पाटील यांनी क्रिकेटमध्ये रनर असतो, तसे पवारांचे ‘रनर’ म्हणून काम करावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.