शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

साखर सहसंचालकांच्या दारात शेतकरी संघटनेतर्फे काळी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:51 IST

आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत.

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी एफआरपीमधील उर्वरित २० टक्के रक्कम कारखान्यांनी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याबद्दल शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या दारात काळी गुढी उभा करून निषेध नोंदविला. ऊसदरावरून पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार राजू शेट्टी यांनी तडजोड करत ८०:२० चा फॉर्म्युला आणला. आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असताना त्याला उसाचे पैसे मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे कारखानदार उसाचे पैसे देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सहकारमंत्री काहीच बोलत नाहीत. ज्यांनी तडजोड केली तेही मूग गिळून गप्प आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुढीपाडव्यादिवशी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात काळी गुढी उभी केल्याचे युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी सांगितले. या गुढीला साखरेच्या माळेऐवजी कारखान्यांनी एफआरपीबाबत दिलेल्या हमीपत्रांची माळ केली असून आठ दिवसांत एफआरपीमधील २० टक्के दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. शिंदे यांनी दिला. यावेळी अजित पाटील, महादेव कोल्हे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, मोहन चौगुले, विष्णू सणगर, किसन पाटील, गुणाजी शेलार, बदाम शेलार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुढी सायंकाळनंतरही उभीच !सकाळी बांधलेली गुढी सायंकाळी उतरली जाते, पण सहसंचालक कार्यालयाबाहेर बांधलेली गुढी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उतरलेली नाही. कार्यालयाला तीन दिवस सुटी असल्याने सोमवारी अधिकाऱ्यांनीच गुढी उतरावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.