शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

साखर सहसंचालकांच्या दारात शेतकरी संघटनेतर्फे काळी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:51 IST

आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत.

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी एफआरपीमधील उर्वरित २० टक्के रक्कम कारखान्यांनी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याबद्दल शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या दारात काळी गुढी उभा करून निषेध नोंदविला. ऊसदरावरून पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार राजू शेट्टी यांनी तडजोड करत ८०:२० चा फॉर्म्युला आणला. आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असताना त्याला उसाचे पैसे मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे कारखानदार उसाचे पैसे देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सहकारमंत्री काहीच बोलत नाहीत. ज्यांनी तडजोड केली तेही मूग गिळून गप्प आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुढीपाडव्यादिवशी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात काळी गुढी उभी केल्याचे युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी सांगितले. या गुढीला साखरेच्या माळेऐवजी कारखान्यांनी एफआरपीबाबत दिलेल्या हमीपत्रांची माळ केली असून आठ दिवसांत एफआरपीमधील २० टक्के दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. शिंदे यांनी दिला. यावेळी अजित पाटील, महादेव कोल्हे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, मोहन चौगुले, विष्णू सणगर, किसन पाटील, गुणाजी शेलार, बदाम शेलार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुढी सायंकाळनंतरही उभीच !सकाळी बांधलेली गुढी सायंकाळी उतरली जाते, पण सहसंचालक कार्यालयाबाहेर बांधलेली गुढी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उतरलेली नाही. कार्यालयाला तीन दिवस सुटी असल्याने सोमवारी अधिकाऱ्यांनीच गुढी उतरावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.