शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या ४०२७ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी माघारीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या ४०२७ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने इच्छुकांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांची दमछाक उडत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी ‘शब्द’ दिला जात आहे. दूध संस्था, विकास संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक राजकारण उफाळून येते. डाव, प्रतिडावातून एकमेकांचे कमकुवत दुवे शोधून त्यावर हल्ला करण्याची रणनिती आखली जाते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदानापर्यंत स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढत जाते. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींमधील ४०२७ जागांसाठी १५ हजार ८३० अर्ज दाखल झाले होते. त्यातील १८७ अर्ज अवैध ठरल्याने आता १५ हजार ६४३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. काही ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न झाले पण यश आले नाही. प्रभागात फार कमी मतदान असल्याने एखाद्याची बंडखोरी कोणाचा गुलाल हिरावून घेते तर कोणाच्या अंगावर अनपेक्षितपणे गुलाल पडतो. त्यामुळे बंडोबांना थंड करताना नेतृत्वाची दमछाक उडत आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार असून त्यानंतर चिन्हे वाटप केले जाणार आहेत. दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी माघारीसाठी झुंबड उडणार आहे. इच्छुकांना इतर संस्थेत घेण्याचा शब्द देऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर कोणाची माघार कोणाच्या पथ्यावर पडू शकते, याचे आडाखे बांधूनच डावपेच आखले जात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक उडत आहे. त्यामुळे आज, किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार की लढाई होणार याचा फैसला होेणार आहे.

दृष्टीक्षेपात ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायती - ४३३

जागा - ४०२७

दाखल अर्ज - १५८३०

अवैध - १८७

वैध अर्ज - १५६४३