शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून विकास निधीत सुडाचे राजकारण

By admin | Updated: September 9, 2015 00:25 IST

महापालिका पदाधिकाऱ्यांचा आरोप : सभागृहाला अधांतरी ठेवून निर्णय

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाची सत्ता असताना कोल्हापूर शहराच्या विकासासाठी ११३१ कोटी रुपयांचा निधी राज्य व केंद्र सरकारकडून आणला; पण त्याचे राजकारण कधी केले नाही; परंतु गेल्या आठ-दहा महिन्यांत भाजपने २० कोटींचा निधी आणला. मात्र, त्याद्वारे सुडाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप महापौर वैशाली डकरे यांच्यासह महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला. विकासकामांसाठी आणलेल्या २० कोटींच्या निधीला आमचा विरोध नाही, तर सभागृहाला अधांतरी ठेवून आणि विश्वासात न घेता ज्या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात आहे त्याला आमचा विरोध आहे, असे राजेश लाटकर यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे सन २००८ मध्ये जो शासननिर्णय झाला आहे, त्यालाही भाजपने हारताळ फासला आहे. जिल्हास्तरीय समितीने राज्य सरकारच्या विकास निधीचे नियोजन करायचे असते. त्यासाठी मनपाचे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ असावे, अशी अट आहे; परंतु सर्व नियम बाजूला ठेऊन कुणीतरी तिसरेच नियोजन करत आहेत, असे लाटकर म्हणाले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुशोभिकरण, शहरांतर्गत जलवाहिनी बदलणे, भुयारी गटार योजना, सुजल योजनेतून हाती घ्यायची कामे आदींसाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चार ते पाचवेळा निवेदने दिली; पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर २० कोटींचा निधी आणून काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे, सुडाचे राजकारण ते करत आहेत, असे लाटकर म्हणाले. भाजपने जे कामांचे नियोजन केले आहे ते चुकीचे आहे. खासगी जागेत रस्ते धरले आहेत. ज्या कामांना निधी जास्त लागणार आहे, त्यांना केवळ दोन ते तीन लाखांची तरतूद केली आहे. काही कामे आधी मंजूर आहेत त्यावर पुन्हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळेच आमचा या कामांना विरोध आहे, असे शारंगधर देशमुख म्हणाले. यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, परिवहन सभापती अजित पोवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, श्रीकांत बनसोडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)२० कोटींच्या निधीबाबत अस्वस्थता का : पालक मंत्रीकोल्हापूर : भाजप सरकारने शहरातील विकासकामांसाठी २० कोटींचा निधी दिला असला तरी त्याचे संपूर्ण नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या नक्की दुरुस्त केल्या जातील, पण सूचना करण्याऐवजी आगपाखड का केली जाते आहे. निधीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीला एवढी अस्वस्थता का? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सुडाचे राजकारण आम्ही नाही तर तेच करत असल्याचा प्रतिआरोपही त्यांनी केला. २० कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामे केली जाणार आहेत. पालकमंत्री पाटील म्हणाले की, कामांची जागेवर जाऊन पाहणी करावी, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला, त्यानुसार संयुक्त पाहणी झाली. आणखी काही गोष्टी निदर्शनास आल्या तर त्यानुसार बदल करण्यात येतील. पण कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एवढी अस्वस्थता का? अगदी दुर्बिण लावून तपासणी करून डोकं खाजवत बसण्यापेक्षा हेच डोकं त्यांनी दुसरीकडे वापरावे.