शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

यशासाठी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ...

गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ध्येय आणि रस्ता निश्चित करा. सकारात्मक विचार व कौशल्य आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करा, कोणत्याही क्षेत्रांत नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी केले.

येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित ‘वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरव म्हणाले, जीवनातील सुख-सोयींमुळे वेळेच महत्त्व दुर्लक्षित झाले आहे. आपण नेहमी पैशाचा हिशेब ठेवतो, वेळेचा हिशेब कधीच ठेवत नाही. परंतु, वेळ ही कायमस्वरूपी गुंतवणूक असून भांडवलाप्रमाणे त्याचा योग्य उपयोग करायला हवा.

प्रत्येक क्षणाची आपण काळजी घेतली तरच प्रत्येक क्षण आपली काळजी घेईल. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपण सिंहावलोकन करायला हवे. दैनंदिन कामातील प्राधान्यक्रम निश्चित करून त्याची पूर्तता वेळेवर करायला हवी. तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संस्थापक चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. सागर माने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. .

यावेळी कार्याध्यक्ष दत्ता पाटील, प्रा. विजय आरबोळे, कल्पना पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

------------------------

* इंजि. शिवानंद मरगुद्दी हे ऑस्ट्रेलियातून वेबिनारमध्ये सहभागी झाले होत. त्याशिवाय ‘रवळनाथ’ व ‘ज्ञानदीप’ परिवारातील मान्यवरासह झेप अ‍कॅडमीचे ९० प्रशिक्षणार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

-------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील ऑनलाईन कार्यशाळेत प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०९०५२०२१-गड-०४