शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आवाडे-हाळवणकर-कारंडे यांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून ...

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून आवाडे-हाळवणकर-कारंडे या तिघांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश आले; परंतु गेल्या वर्षभरात एकत्र असूनही पालिकेचा कारभार सुधारण्यात मात्र हलगर्जीपणा झाला आहे. येत्या वर्षभरात पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा कारभार महत्त्वाचा ठरणार आहे.

नगरपालिकेतील कारभाराविषयी शहरवासीयांत तीव्र संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानसभा निवडणुकीत बसला. हाळवणकर यांनी विशेष रस्ते अनुदानातून १०७ कोटी रुपयांचे रस्ते खास इचलकरंजी शहरासाठी मंजूर करून आणूनही त्याचा योग्यवेळी फायदा करून घेता आला नाही. त्याला नगरपालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गतवर्षी नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलून नव्याने आवाडे व कारंडे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. तीच सत्ता कायम ठेवण्यात तिघांना यावर्षीही यश मिळाले. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी आमदारकीच्या माध्यमातून कामे करून आणण्यासाठी नगरपालिका सत्तेत राहणे आवश्यक आहे, असे म्हणत ताराराणी आघाडीला हाताशी धरून राजकीय खेळी करत वजनदार खाते आपल्या पारड्यात पाडून घेतले. हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर आगामी निवडणुकीत आसूड ओढला जाणार आहे. त्यामुळे त्याला सर्वच घटक जबाबदार राहतील, याची दक्षता घेत सावधगिरीने सत्तेत आवाडे-कारंडे या दोघांना सहभागी करून घेतले तर कारंडे यांना बाजूला करून ताराराणी आघाडीशी समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याने योग्य निर्णय घेत मदन कारंडे यांनी तडजोडीची भूमिका घेऊन सत्तेत सहभाग टिकवला. त्यामुळे तिघांचीही राजकीय खेळी यशस्वी बनली.

चौकटी

कारभार सुधारणार की....

प्रवाहात हात धुऊन घेणे, अशा प्रवृत्ती बाजूला ठेवून प्रामाणिक व निष्ठावंत व्यक्तीच्या हातात एकहाती कारभार दिल्याशिवाय नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होणार नाही. त्यामुळे या अखेरच्या वर्षी तिघांकडून काही ठोस हालचाल केली जाते का, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ हे महत्त्वाचे ठरणार आहे.

जांभळे गटाचे अस्तित्व अस्पष्ट

विरोधी बाकावर असले तरी सागर चाळके, प्रकाश मोरबाळे हे आपल्या ताराराणी आघाडीचे तसेच शशांक बावचकर हे कॉँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवून सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरतात. परंतु सत्तेच्या ‘समीकरणा''तून बाहेर पडलेल्या जांभळे गटाचे मात्र अस्तित्व अस्पष्ट झाले आहे.