शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आवाडे-हाळवणकर-कारंडे यांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून ...

नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीवरून ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीतून आवाडे-हाळवणकर-कारंडे या तिघांना सत्ता समीकरणे जुळविण्यात यश आले; परंतु गेल्या वर्षभरात एकत्र असूनही पालिकेचा कारभार सुधारण्यात मात्र हलगर्जीपणा झाला आहे. येत्या वर्षभरात पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा कारभार महत्त्वाचा ठरणार आहे.

नगरपालिकेतील कारभाराविषयी शहरवासीयांत तीव्र संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानसभा निवडणुकीत बसला. हाळवणकर यांनी विशेष रस्ते अनुदानातून १०७ कोटी रुपयांचे रस्ते खास इचलकरंजी शहरासाठी मंजूर करून आणूनही त्याचा योग्यवेळी फायदा करून घेता आला नाही. त्याला नगरपालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गतवर्षी नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलून नव्याने आवाडे व कारंडे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. तीच सत्ता कायम ठेवण्यात तिघांना यावर्षीही यश मिळाले. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी आमदारकीच्या माध्यमातून कामे करून आणण्यासाठी नगरपालिका सत्तेत राहणे आवश्यक आहे, असे म्हणत ताराराणी आघाडीला हाताशी धरून राजकीय खेळी करत वजनदार खाते आपल्या पारड्यात पाडून घेतले. हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर आगामी निवडणुकीत आसूड ओढला जाणार आहे. त्यामुळे त्याला सर्वच घटक जबाबदार राहतील, याची दक्षता घेत सावधगिरीने सत्तेत आवाडे-कारंडे या दोघांना सहभागी करून घेतले तर कारंडे यांना बाजूला करून ताराराणी आघाडीशी समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याने योग्य निर्णय घेत मदन कारंडे यांनी तडजोडीची भूमिका घेऊन सत्तेत सहभाग टिकवला. त्यामुळे तिघांचीही राजकीय खेळी यशस्वी बनली.

चौकटी

कारभार सुधारणार की....

प्रवाहात हात धुऊन घेणे, अशा प्रवृत्ती बाजूला ठेवून प्रामाणिक व निष्ठावंत व्यक्तीच्या हातात एकहाती कारभार दिल्याशिवाय नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होणार नाही. त्यामुळे या अखेरच्या वर्षी तिघांकडून काही ठोस हालचाल केली जाते का, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ हे महत्त्वाचे ठरणार आहे.

जांभळे गटाचे अस्तित्व अस्पष्ट

विरोधी बाकावर असले तरी सागर चाळके, प्रकाश मोरबाळे हे आपल्या ताराराणी आघाडीचे तसेच शशांक बावचकर हे कॉँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवून सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरतात. परंतु सत्तेच्या ‘समीकरणा''तून बाहेर पडलेल्या जांभळे गटाचे मात्र अस्तित्व अस्पष्ट झाले आहे.