शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपनगरांचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:35 IST

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : वाढती धूळ, जळालेला कचरा, कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाईअभावी घनकचºयांच्या दुर्गंधीने तुंबलेले नाले, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे उपनगरांत राहणाºया नागरिकांत दमा, श्वसनविकार आणि फुप्फुस विकारांत प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषण , धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : वाढती धूळ, जळालेला कचरा, कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाईअभावी घनकचºयांच्या दुर्गंधीने तुंबलेले नाले, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे उपनगरांत राहणाºया नागरिकांत दमा, श्वसनविकार आणि फुप्फुस विकारांत प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असल्याने त्यांनाश्वसनाचे गंभीर विकार जडतआहेत.धूळप्रवण उपनगरे अशी अलीकडे उपनगरांची नवी ओळख निर्माण होत आहे. निश्चित मानांकाइतके प्रदूषण आता उपनगरांतही वाढत चालल्याने उपनगरांचा श्वास गुदमरतोय. उपनगरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.धूळ आणि धुरांच्या मिश्रणाने उपनगरवासीयांचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले तरी विविध प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.उपनगरांतील मुख्य रस्ते सिमेंट, डांबराचे असले तरी या रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर प्रचंड धूळ उडते. उपनगरांतील बहुतांशी कॉलन्यातील रस्ते विकसित नाहीत. त्यामुळे वाहन जाताच रस्ते धूळप्रवण बनतात. रस्त्यांवरील धूळ हवेत मिसळून नाकावाटे नागरिकांचे श्वसनसंस्थेत प्रवेश करते. सायंकाळच्यावेळी रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर व जड हवा यांच्या मिश्रणाची दाट चादर उपनगरांतील वातावरणात पसरते. श्वसन विकारात खोकला, कफ होणे, श्वास घेण्याचा त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे, आदी गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे.वाढते प्रदूषण, धकाधकीची जीवनशैली व मानसिक ताण यामुळे दिवसेंदिवस अस्थमाचे रुग्ण वाढत असून, वैशिष्ट्य म्हणजे शाळकरी मुलांना मोठ्या संख्येने अस्थमाने जाळ्यात ओढले आहे. उपनगरांत अनेकांना अस्थमा झाल्याची कल्पनाही नसते. शाळकरी मुलांतील वाढते अस्थमाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अनेक डॉक्टरांचे मतआहे.उपनगरातील वातावरणातील प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कार्बन मोनोआॅक्साईड, सल्फेट नायट्रेटस, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉनचे पार्टीकल कण श्वासाद्वारे श्वसननलिकेत जावून ती लालसर होऊन आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूकता बाळगणे क्रमप्राप्तआहे.वाढलेली वाहनांची संख्या, कचरा उठावातील अनियमिततेने परिसरात पसरणारी दुर्गंधी, घनकचºयांनी तुंबलेले नाले यामुळे उपनगरवासीयांचा श्वास गुदमरतोय. पर्यावरण प्रदूषणप्रश्नी आता नागरिकांनी गंभीर होऊनसावधगिरीची पावले उचलणे क्रमप्राप्त बनले आहे.वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण व धूळ मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क किंवा नाकास रुमाल बांधावा. प्रदूषण कमी होण्यासाठी सायकलचा वापर वाढवावा, परिसर स्वच्छतेस प्राधान्य द्यावे.- डॉ. सुनील चं. बकरे,सहयोगी प्राध्यापक यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली