शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांत म्हणणे सादर करा

By admin | Updated: January 21, 2017 00:29 IST

सर्वोच्च न्यायालय : नगरसेवक अपात्रता प्रकरणी राज्य सरकारला निर्देश

कोल्हापूर : निवडणूक झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवरील संभाव्य कारवाईबाबत आपले म्हणणे दोन आठवड्यांत मांडावे, असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले. मुंबई उच्च न्यायालयाने विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्याला स्थगिती देण्यास मात्र सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी निवडणूक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्रे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली नव्हती. राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा नगरसेवकांना निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केला म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर निकाल देताना, राज्य निवडणूक आयोगाकडे विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर प्रचलित कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होेते. या आदेशामुळे आपल्यावर अपात्रतेची एकतर्फी कारवाई होईल, या भीतीने कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांच्यावतीने महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन (एस.एल.पी.) दाखल केली आहे. अशाच प्रकारच्या एस.एल.पी. राज्यभरातील असंख्य नगरसेवकांकडून दाखल केल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. चलामेश्वर व न्या. सप्रे यांच्यासमोर एकत्र सुनावणी झाली. महापौर फरास यांचे वकील के. व्ही. विश्वनाथ यांनी नगरसेवकांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली, तर त्यांना वकील मयांक पांडे यांनी सहाय्य केले. नगरसेवकांना विभागीय जातपडताळणी समितीकडून वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात आली नाहीत. समितीने तसे लेखी कबुलीपत्र राज्य निवडणूक आयोगास दिले आहे. राज्य सरकारनेच कायदा केला, आणि त्यांनीच नेमलेल्या समितीने वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. ही कायदा आणि कारवाई यातील विसंगती आहे. त्यात नगरसेवकांचा काही एक दोष नाही, असा युक्तिवाद विश्वनाथ यांनी केला. पंधरा मिनिटांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपले मत नोंदविले. राज्य सरकारने कायदा केला, परंतु त्यांनीच नेमलेल्या समितीकडून विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत. कायद्यात बदल का केला गेला नाही. राज्य सरकारने का निर्णय घेतला नाही, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. राज्य सरकारचे याबाबत काय म्हणणे आहे, ते दोन आठवड्यात सादर करावेत, असे निर्देश न्यायालयाने सरकारी वकील मेहता यांना केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांना तात्पुरते अभय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिल्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या नगरसेवकांना किमान दोन आठवडे अभय मिळाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राज्य सरकार कारवाई करील, असे दिसत नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.