शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

धर्मवादाला बगल देऊन अभ्यास करा

By admin | Updated: July 10, 2015 00:06 IST

राजा दीक्षित : शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात नवीन संशोधकांना कानमंत्र

कोल्हापूर : पुराभिलेखागारांमध्ये असणाऱ्या कागदपत्रांइतकाच साहित्याचा आणि भाषेचा अभ्यास इतिहासकाराला अत्यंत उपयुक्त आहे. नवीन संशोधकांनी संकुचित धर्मवाद, जातवाद, प्रादेशिक अस्मिता यांना बगल देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहन पुणे विद्यापीठातील प्रा. राजा दीक्षित यांनी बुधवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे आयोजित निमंत्रित व्याख्यानमालेत ते बोलत होते.‘मराठी माणसांची ऐतिहासिक जडणघडण’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. इतिहास विभागातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. पद्मजा पाटील होत्या.प्रा. दीक्षित म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास हा मराठी मानसिकतेचा इतिहास आहे. भौगोलिक ढाच्यामध्ये त्याला बंदिस्त करता येणार नाही. ग्यानबा-तुकोबा आणि शिवबा या तिघांबद्दलचा आदर हे मराठी अस्मितेचे लक्षण आहे. मराठीपणाची नेमकी व्याख्या काय किंवा मराठी अस्मितेची व्यवच्छेदक लक्षणे नेमकी कोणती याची मीमांसा करत असताना प्रा. दीक्षित यांनी महाराष्ट्राच्या समावेशकता आणि समन्वयवादी भूमिकेची पाळेमुळे अगदी प्रागैतिहासिक काळापर्यंत कशी शोधता येतात याचे विवेचन केले. गुरुचरित्र अथवा महिकावतीची बखर यामध्ये येणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्म’ या संज्ञेची उत्पत्तीच मुळी हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या समन्वयाशी कशी जोडलेली आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रा. पद्मजा पाटील म्हणाल्या, पारंपरिक इतिहासकार इतिहास लेखनासाठी संदर्भसाधन म्हणून साहित्याला फारसे महत्त्व देत नसत पण साहित्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. मध्ययुगातील प्रसिद्ध संतकवयित्री बहिणाबार्इंच्या अभंगांचे नाते आजच्या अगदी आधुनिक काळातील स्त्रीवादी लेखनाशी जुळते हे त्यांचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते आणि त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना मराठी साहित्याचा साधन म्हणून वापर करणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमास प्रा. डॉ. एम. ए. लोहार, नीलांबरी जगताप, डॉ. मंजुश्री पवार, प्रा. कल्पना मेहता, डॉ. संतोष जठीथोर आदी उपस्थित होते. डॉ. अवनिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)