शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

विद्यार्थ्यांना ईबीसीच्या परताव्याची प्रतीक्षा----लोकमत हेल्पलाईन न्यूज

By admin | Updated: May 3, 2016 00:39 IST

पालक नाराज : अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ट्युशन फीमधील ५० टक्के परतावा

कोल्हापूर : अभियांत्रिकी  महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (ईबीसी) त्यांनी भरलेल्या शुल्कातील ५० टक्के परताव्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सन २०१४-१५ मधील ईबीसीचा परतावा त्यांना अजून मिळालेला नाही. याबाबतची व्यथा शाहूपुरीतील पालक रवींद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे मांडली.तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक ईबीसी सवलतीला पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या शुल्कापैकी ट्युशन फीमधील ५० टक्के रकमेचा परतावा दिला जातो. सन २०१४-१५ मधील ईबीसी परतावा लवकरच दिला जाईल, असे सांगून या सवलतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी खाते उघडले. पण, यानंतर वर्ष उलटत आले तरी, अद्यापही त्यांना ईबीसी सवलतीचा परतावा मिळालेला नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शुल्काची रक्कम मोठी आहे. काही पालकांनी कर्ज काढून आपल्या पाल्यांचे शुल्क भरले आहे. अशा स्थितीत त्यांचे पाल्य ईबीसी सवलतीसाठी पात्र असूनही त्याचा परतावा मिळत नाही .पालकांनी महाविद्यालयात विचारणा केल्यानंतर त्यांना शासनाकडून पैसे यायचे आहेत, असे उत्तर असल्याचे रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत पुण्यातील कार्यालयाशी संपर्क साधला असता लवकरच ईबीसीचा परतावा दिला जाईल, असे आश्वासन मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात खात्यावर रक्कम जमा झालेली नाही.दरम्यान, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे मत जाणून घेण्यासाठी संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयात (२२६२०६०१,०२ आणि २२६४११५०/५१) या क्रमांकावर दूरध्वनी केला असता याठिकाणी तो उचलण्यात आला नाही. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल. (प्रतिनिधी) ईबीसी लवकरच मिळेलव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ईबीसीचा परतावा लवकर मिळावा यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिले होते, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख अमित वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणाची माहिती घेतली असता सन २०१४-१५ चा ईबीसी परतावा मंजूर झाला असून, तो लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल तसेच तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सन २०१५-१६ साठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, असे काही महाविद्यालयांतून सांगण्यात आले आहे.