शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

विद्यार्थ्यांसाठी ‘केएमटी’च्या दोन फेऱ्या सुरू करणार

By admin | Updated: July 26, 2014 00:34 IST

विजयालक्ष्मी बिदरी यांचे आश्वासन

कोल्हापूर : के.एम.टी.कडे असणाऱ्या खासगी ठेकेदारांनी थकबाकीसाठी २० मेपासून ३० बसची सेवा बंद केल्यानंतर १ जून २०१४ पासून आजूबाजूच्या १९ गावांतील बससेवा बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आज, शुक्रवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी किमान सकाळी व संध्याकाळच्या टप्प्यात दोन-दोन फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त बिदरी यांनी यावेळी दिले. के.एम.टी.कडे असणाऱ्या ३० खासगी बसेसच्या ठेकेदारांनी एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी त्यांची बससेवा बंद केली. तसेच दररोज किमान सव्वादोन लाखांहून अधिकचे नुकसान सोसणाऱ्या के.एम.टी.पुढील अडचणी वाढल्या आहेत. यातच ८५० कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकण्याचे प्रकार वाढल्याने शहरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘के.एम.टी.’ने १९ गावांतील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता लवकरच विद्यार्थ्यांसाठी या गावांतील बससेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रतिदिन किमान दोन फेऱ्या सुरू करण्याच्या पालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना प्रामुख्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आयुक्त बिदरी यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)बालिंगा, कोगे, बहिरेश्वर, खुपिरे-यवलूज, कुडित्रे, शिरोली दुमाला, कोयना कॉलनी, कात्यायनी, वडकशिवाले, बाचणी, खेबवडे, येवती, चुये, हळदी, बाचणी, बेले, वाकरे, मौजे वडगाव या मार्गांवरील बससेवा १ जून २०१४ पासून बंद करण्यात आली होती. ही सेवा आता विद्यार्थ्यांसाठी सकाळी व संध्याकाळच्या सत्रात सुरू केली जाणार आहे.