शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रतीक्षा लागली आहे.

ग्रामीण भागातील गडहिंग्लज, कागल, राधानगरी, इचलकरंजी, वारणा आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे त्यांच्या गावापासून जवळ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. मात्र, उपनगरे आणि शहरालगतच्या करवीर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांचा शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे ओढा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने शहरातील ३५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरातील अकरावीची प्रवेशक्षमता १४८६०, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५० महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ३५ हजार इतकी आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून आयटीआयकडील विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अकरावीच्या ४० ते ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहत नसल्याचे चित्र आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन पध्दतीने राबविली जाते. यावर्षीदेखील हीच पध्दत राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या गुणांवर होणार असल्याने या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

पॉईंटर

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३५

एकूण जागा : १४८६०

गेल्यावर्षी किती अर्ज आले : १२९६१

किती जणांनी प्रवेश घेतला : ६८७३

किती जागा रिक्त राहिल्या : ७८०७

चौकट

शहरातील ४० टक्के जागा रिक्त

गेल्या तीन वर्षांपासून अकरावीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे. साधारणत: ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रवेश व्हावेत

प्रवेशाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी.

-प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी.

शहरातील महाविद्यालयांच्यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रक्रिया योग्य आहे. ती यापुढेही कायम राहावी.

-सी. एम. गायकवाड, आजीव सेवक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग.