शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रतीक्षा लागली आहे.

ग्रामीण भागातील गडहिंग्लज, कागल, राधानगरी, इचलकरंजी, वारणा आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे त्यांच्या गावापासून जवळ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. मात्र, उपनगरे आणि शहरालगतच्या करवीर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांचा शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे ओढा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने शहरातील ३५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरातील अकरावीची प्रवेशक्षमता १४८६०, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५० महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ३५ हजार इतकी आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून आयटीआयकडील विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अकरावीच्या ४० ते ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहत नसल्याचे चित्र आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन पध्दतीने राबविली जाते. यावर्षीदेखील हीच पध्दत राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या गुणांवर होणार असल्याने या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

पॉईंटर

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३५

एकूण जागा : १४८६०

गेल्यावर्षी किती अर्ज आले : १२९६१

किती जणांनी प्रवेश घेतला : ६८७३

किती जागा रिक्त राहिल्या : ७८०७

चौकट

शहरातील ४० टक्के जागा रिक्त

गेल्या तीन वर्षांपासून अकरावीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे. साधारणत: ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रवेश व्हावेत

प्रवेशाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी.

-प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी.

शहरातील महाविद्यालयांच्यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रक्रिया योग्य आहे. ती यापुढेही कायम राहावी.

-सी. एम. गायकवाड, आजीव सेवक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग.