शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनो, ‘एटीएस’ला सहकार्य करा

By admin | Updated: January 6, 2015 00:56 IST

भानुप्रताप बर्गे : राज्य दहशतवादीविरोधी पथकाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

कोल्हापूर : आपण ज्या ठिकाणी राहता, जाता, त्याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट दहशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) कळवा व एटीएसला सहकार्य करा, असे आवाहन आज, सोमवारी राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे पुणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केले.महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादासंबंधी विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेच्या आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे, प्राचार्य डॉ. एच. बी. पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विठ्ठल पाटील उपस्थित होते.भानुप्रताप बर्गे यांनी, विद्यार्थ्यांनी आपली सर्वप्रथम मानसिकता बदलली पाहिजे. पोलिसांबद्दल असणारी भीती मनामध्ये न बाळगता ती काढून टाकली पाहिजे. आपल्या देशात सहा अतिरेकी वॉटेंड आहेत. त्यांचा वावर कोल्हापुरात होता. त्यामुळे ‘तुम्हाला रेल्वे स्टेशन, बसस्थानक, महाविद्यालय परिसरात अशाप्रकारची संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तुम्ही तत्काळ पोलिसांना कळवा. त्यासाठी नेहमी डोळे व कान उघडे ठेवा,’ असे आवाहन त्यांनी केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी भानुप्रताप बर्गे यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना बर्गे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. नक्षलवादी सामना करण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी एकत्र का येत नाहीत? नक्षलवादी कारवाईमध्ये महिला आहेत का? नक्षलवादी कारवाईवेळी एखाद्या घटनेचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून सुरू असते. जसे २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे थेट प्रसारण वृत्त वाहिन्यांवर दाखविले जात होते. अशाप्रकारचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. त्यावर बर्गे यांनी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये नलिनी या महिलेचा हात होता याची आठवण करून दिली. तसेच नक्षलवादी कारवायांवेळी प्रसारमाध्यमांकडून होणारे थेट प्रसारण होणार नाही अशी काळजी घ्यावी. ते प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एटीएसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी माहिती पत्रक देण्यात आले.कोल्हापुरात सोमवारी महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या विद्यमाने विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेत बोलताना भानुप्रताप बर्गे.बर्गे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे....महाविद्यालयासाठी एकच प्रवेशद्वार असावे.पुण्याप्रमाणे कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयांनी आवारात सीसीटीव्ही लावावेत.आपला मोबाईल नंबर आहे तोच आपल्या गाडीचा शक्यतो नंबर ठेवावा.मोबाईलचा वापर जाणीवपूर्वक टाळा.विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जागृत करावी.कोणत्याही वस्तूला हात लावू नका, अथवा व्यक्ती संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवा.