शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

विद्यार्थ्यांनो, ‘एटीएस’ला सहकार्य करा

By admin | Updated: January 6, 2015 00:56 IST

भानुप्रताप बर्गे : राज्य दहशतवादीविरोधी पथकाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

कोल्हापूर : आपण ज्या ठिकाणी राहता, जाता, त्याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट दहशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) कळवा व एटीएसला सहकार्य करा, असे आवाहन आज, सोमवारी राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे पुणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केले.महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादासंबंधी विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेच्या आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे, प्राचार्य डॉ. एच. बी. पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विठ्ठल पाटील उपस्थित होते.भानुप्रताप बर्गे यांनी, विद्यार्थ्यांनी आपली सर्वप्रथम मानसिकता बदलली पाहिजे. पोलिसांबद्दल असणारी भीती मनामध्ये न बाळगता ती काढून टाकली पाहिजे. आपल्या देशात सहा अतिरेकी वॉटेंड आहेत. त्यांचा वावर कोल्हापुरात होता. त्यामुळे ‘तुम्हाला रेल्वे स्टेशन, बसस्थानक, महाविद्यालय परिसरात अशाप्रकारची संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तुम्ही तत्काळ पोलिसांना कळवा. त्यासाठी नेहमी डोळे व कान उघडे ठेवा,’ असे आवाहन त्यांनी केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी भानुप्रताप बर्गे यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना बर्गे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. नक्षलवादी सामना करण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी एकत्र का येत नाहीत? नक्षलवादी कारवाईमध्ये महिला आहेत का? नक्षलवादी कारवाईवेळी एखाद्या घटनेचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून सुरू असते. जसे २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे थेट प्रसारण वृत्त वाहिन्यांवर दाखविले जात होते. अशाप्रकारचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. त्यावर बर्गे यांनी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये नलिनी या महिलेचा हात होता याची आठवण करून दिली. तसेच नक्षलवादी कारवायांवेळी प्रसारमाध्यमांकडून होणारे थेट प्रसारण होणार नाही अशी काळजी घ्यावी. ते प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एटीएसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी माहिती पत्रक देण्यात आले.कोल्हापुरात सोमवारी महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या विद्यमाने विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेत बोलताना भानुप्रताप बर्गे.बर्गे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे....महाविद्यालयासाठी एकच प्रवेशद्वार असावे.पुण्याप्रमाणे कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयांनी आवारात सीसीटीव्ही लावावेत.आपला मोबाईल नंबर आहे तोच आपल्या गाडीचा शक्यतो नंबर ठेवावा.मोबाईलचा वापर जाणीवपूर्वक टाळा.विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जागृत करावी.कोणत्याही वस्तूला हात लावू नका, अथवा व्यक्ती संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवा.