शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

गुणपत्रिकांसाठी विद्यार्थी आक्रमक

By admin | Updated: September 1, 2015 00:23 IST

परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड; विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

कोल्हापूर : गुणपत्रिकेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक होत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवनवर सोमवारी मोर्चा काढला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संबंधित संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली.विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लागून देखील अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पुढील वर्गातील प्रवेश रखडले आहेत. याबाबत चंदगडमधील चाळीसहून विद्यार्थी अ‍ॅड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यासाठी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी परीक्षा विभाग, विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यात विद्यापीठात परीक्षाविषयक कामकाजासाठी आलेले कोल्हापूर, सांगली, सातारा, फलटणमधील शंभराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. तेथून अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चाने ते परीक्षा भवन येथे पोहोचले. याठिकाणी ‘विद्यापीठाचा धिक्कार असो’, ‘भोंगळ कारभार करणाऱ्या परीक्षा विभागाचा धिक्कार’, ‘गुणपत्रिका लवकर मिळाल्याच पाहिजेत’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्ते घोषणाबाजीनंतर भवनच्या परिसरात घुसले. शिवाय त्यांनी भवनच्या व्हरांड्यात असलेल्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व त्यांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकांत धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. यााठिकाणी उपस्थित असलेले माजी बीसीयुडी संचालक डॉ. बी. एल. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांत केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे परीक्षा भवनमध्ये दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी परीक्षा नियंत्रकांच्या कक्षात बोलाविले. यावेळी अ‍ॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील आणि डॉ. बी. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत डॉ. शिंदे, उपकुलसचिव जी. आर. पळसे यांच्याशी चर्चा केली. दीड तासांहून अधिक वेळ चाललेल्या चर्चेत डॉ. शिंदे यांनी शनिवारपर्यंत गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले. आंदोलनात कृष्णा रेगडे, भारत गावडे, जयवंत पेडणेकर, अनिल तळगुळकर, संदेश अवडण, शरद पाटील, तानाजी गावडे, नीलेश रेडेकर आदींसह दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)...अन्यथा सोमवारी ‘टाळे ठोक’ आंदोलनगुणपत्रिका मिळत नसल्याची तक्रार घेऊन विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यानंतर आम्ही २९ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळाव्यात अन्यथा परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन चंदगडच्या तहसीलदारांना दिले होते. या मुदतीपर्यंत गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने आज आंदोलन केल्याचे अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले. ते म्हणाले, प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी येत्या शनिवारपर्यंत सर्व गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे. या मुदतीत गुणपत्रिका न मिळाल्यास विद्यापीठात सोमवारी (दि. ७) ‘टाळे ठोक’ आंदोलन केले जाईल.