शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

विद्यार्थी अपघात अनुदानही थकले

By admin | Updated: July 4, 2017 00:15 IST

विद्यार्थी अपघात अनुदानही थकले

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शालेय मुलांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करायची; मात्र वर्ष-वर्ष त्यासाठीचे अनुदान द्यायचे नाही. संबंधितांच्या घरच्या मंडळींनीही अखेर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही या प्रकरणाचा नादच सोडावा, अशी परिस्थिती निर्माण करायचा चंगच जणू काही शासनाने बांधला आहे का? अशी विचारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांच्या मृत्यूनंतरही त्यांना मिळणारे अनुदान वर्षभर अदा न करणे ही एक प्रकारची संबंधितांची चेष्टाच म्हणावी लागेल. कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने पाठविलेल्या २५ प्रस्तावांचे १८ लाख ३६ हजार रुपये गेले वर्षभर संबंधितांना मिळालेलेच नाहीत. राज्य सरकारने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजीव गांधी विद्यार्र्थी अपघात अनुदान योजना’ सन २०१२-१३ पासून लागू केली. तत्पूर्वी खासगी विमा कंपनीमार्फत अपघात नुकसानभरपाई योजना लागू करण्यात आली होती. या विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्यात दिरंगाई, टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने, राज्य सरकारने शिक्षण विभागामार्फत स्वत:च ही योजना राबविण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण संचालकच हे अनुदान मंजूर करतात. मात्र, तरीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. अनुदान उपलब्ध होत नसल्याने प्रस्ताव मंजूर होऊनही वारसांना ते मिळत नसल्याचे अनुभव मिळत आहेत.आवश्यक त्या कागदपत्रांची पाच-सहा महिने जुळवाजुळव करून हे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे व तेथे प्रस्तावांची छाननी करून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे पाठविले जातात व या समितीच्या शिफारशीनुसार मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठविले जातात. कोल्हापूर येथे ९ मे २०१६ आणि २१ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत २५ प्रस्ताव मंजूर झाले. त्यापोटी १८ लाख ३६ हजार रुपये अनुदान येणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार लेखी पाठपुरावा करूनही ही रक्कम अजूनही मिळालेली नाही. किमान या रकमेसाठी तरी वारसांना फेऱ्या मारायला लावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आतापर्यंत ९० लाख रुपयांचे अनुदानयोजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९३ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ९३ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. आता २५ वारसांची साडेअठरा लाख रुपये येणे बाकी आहे. जुने पैसे येणे बाकी असतानाच २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या समितीची बैठक होऊन आणखी ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. अशी आहे योजनाशालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची भरपाईएक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपयेदोन्ही अवयव निकामी झाल्यास ५० हजार रु. भरपाई मिळते.